शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३


एप्रिल २६

कमजोरी - strong point सोबतच weak points सुद्धा नायकाला अभिव्यक्त establish व्हायला मदत करतात. काही वेळेला तो अन्याय सहन करतो का करतो तर त्याची आई खलनायकाच्या तावडीत असते. आई हि त्याची कमजोरी असते तरीही त्याच्या character ला बळ देते. आई साठी तो मार खातो तरीही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवतो. कधी नायक भित्रा सुद्धा असू शकतो, त्याचा भित्रेपणा त्याच्यातल्या माणसाला जास्त जिवंत करतो. आणि मग तो त्याच्या स्वत:च्या आतील भीतीवर विजय मिळवतो. आणि अचानक मोठा संघर्ष बघायला देतो तेव्हा सुखद आश्चर्य युक्त धक्का देतो. नायकच्या आतील कमजोरी त्याच्या हव्या असलेल्या धेय्याला मिळवण्याचा प्रवास कठीण करतो त्यामुळे अनिश्चितता वाढवते आणि त्यामुळे कथेमध्ये रंगत येते. नायकाच्या स्वभावात असलेल्या कमजोरी मुळे कधी तो अचानक संकटात अडकतो. प्रेक्षकांना हाही धक्का कथेशी एकरूप करू शकतो. कल्पक लेखक नायकाच्या एखाद्या कमजोरी चच शेवटी भांडवल करून खूप गोड आश्चर्य युक्त धक्का देवून मोठ्या संकटातून त्याला वाचवतो. नायका साठी वेगवेगळ्या शक्ती आता पर्यंत खूप वापरून झाल्या आहेत. आता वेळ आहे नायकाच्या एखाद्या कमजोरितुन तो कसा उभा राहतो. आणि संघर्ष करतो आणि त्याला हवी असलेली गोष्ट त्याचे ध्येय मिळवतो. आपण निवडलेली लगान काय आहे ? तेच भुवन हा क्रिकेटच्या बाबतीत कमजोर व्यक्ती आहे आणि तो त्या साठी स्वत:ला पूर्ण योग्य बनवतो, एक सशक्त टीम बनवतो आणि जिंकतो. आपल्या कमजोरी वर खुबीने मात करणे आणि युक्तीने त्या बाबतीत बलवान असलेल्या वर विजय मिळवणे खूप सुखावणारे असते.

अंर्त:मन (Subconscious Mind) - सिनेमा पहाणे हा एक भावनिक अनुभव असतो. कुणीही सिनेमा काहीतरी ज्ञान मिळवण्या साठी बघत नाही. काहीही शिकण्या साठी सिनेमा बघायला जात नाही. माणूस सिनेमा पाहतो तो त्याच्या मानसिक अवस्थेला सुखावण्या साठी. स्वत:ला विसरण्या साठी. त्या दोन तासात त्याला जर त्याच्या काही विवंचना ची आठवण झाली तर आपण फेल झालो असे समजावे. पण जर का त्या दोन तासात त्याला त्याच्या व्यावसाईक घरगुती समस्यांची आठवणही झाली नाही. तो पूर्णत: कथेमध्ये स्वत:ला विसरला आणि ज्यावेळी पडदा सफेद झाला त्यावेळी एका अदभुत अनुभवातून बाहेर आला. त्याला  स्वत:ला सावरावे लागले तर आपण फिल्म मेकर म्हणून जिंकलो असे समजावे. मग हा असा अनुभव त्याला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो आणि तो पुन्हा पुन्हा तो सिनेमा पाहतो. त्याच्या मित्र परिवारात आवर्जून तो सिनेमा बघण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि तुमचा सिनेमा सुपर हिट होवू शकतो.
पण हे करण्यासाठी तुम्ही त्याला भावनिक करण्या शिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा भावनिक अनुभव देण्यासाठी तितक संवेदना शील मन आपल्या अभिनेत्याच असायला हव. महत्वाच हे की तुमच्या कथेमधील व्यक्तिरेखा देखील तितक्या संवेदनशील असायला हव्यात. फक्त नायक नाही तर सर्व व्यक्तिरेखा मनाला भिडणाऱ्या असायला हव्यात. अगदी खलनायक सुद्धा ! पण कथा सर्वात जास्त नायकाची असते म्हणून हा गुण नायक कडे परिपूर्ण स्वरुपात असावा. त्याच्या प्रत्येक कृती तून त्याच्या प्रत्येक वाक्यातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला गेला पाहिजे. आणि ती क्षमता लेखकांनी निर्माण करून ठेवलेली पाहिजे. आपल्या चिंतनातून विचार प्रक्रियेतून ह्या व्यक्तिरेखा घडवल्या गेल्या तर त्या परिपूर्ण होतात. आपल्या सभोवताली आपण पाहतो ऐकतो त्यातून काही बाही बारीक सारीक लकबी, घटना, आपल्या नायकाच्या वागण्या मध्ये जणू त्या त्याच्याच आहेत अश्या पद्धतीने आणाव्या लागतात. आपल्या नायकाचे अंर्त:मन संवेदनशील आणि अनुभव संपन्न करण्यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता असते. हा बराच मानसशास्राचा भाग आहे . अश्या स्वभावाचा माणूस अश्या वेळी कसा वागेल ? याचे समर्पक उत्तर आपल्या स्क्रीन प्ले मध्ये मांडता आले पाहिजे तर ते प्रेक्षकांना भावपूर्ण करू शकेल !

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखांचे प्रकार (Types of Character)


खर म्हणजे व्यक्तिरेखांचे प्रकार म्हणण चुकीच आहे. पण ते फक्त आपल्या भाषेच्या सोयीसाठी आपण वापरू यात. म्हणजे निर्देश करण्यासाठी खालील प्रमाणे व्यक्तिरेखांचे प्रकार पाडता येतील.

१ नायक -

यात आपण नायिकेचा ही अंतर्भाव करू . काही वेळा नायक दोन तीन किंवा चार हि असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या नायिकाही असतात. पण कथेमध्ये चार नायकांना लेखक न्याय देवू शकत नाही. तुम्ही असे सिनेमे पाहिलेत तर सहज लक्षात येईल कि चार नायक असले तरी एक मुख्य नायक असतो. जो सर्वात जास्त आकषर्ण केंद्र ठरतो. बाकीचे त्याला मदत करणारे ठरतात. त्याच्या भूमिका त्या मानाने कमी कार्यशील active असतात. नायक म्हणजे ज्याच्या सोबत कथा चालते, प्रेक्षक ज्याच्या संगतीने कथा अनुभवतात. ज्याला काहीतरी ध्येय असते, त्या ध्येयासाठी तो धडपडत असतो. त्याची ही धडपड पाहण्या सारखी असते. आणि तीच खरी कथा असते. ह्या नायकाच्या ध्येय वरून लेखकाचे लक्ष ढळू नये. सदोदित हे ध्यानात असावे की सर्व बाकीचे characters नायकाची ही धडपड दाखवण्या साठी आहेत. त्यांना आपण सहाय्यक व्यक्तिरेखा म्हणू , या सर्वांना त्यांचे स्वत:चे आयुष्य आहे, त्याचे स्वत:चे ध्येय ही आहे, पण ही कथा त्यांची नाही. नायकाच्या कथेला (म्हणजेच आपल्या मूळ कथेला) बळ देण्यासाठी, नायकाच्या कथेचा भाग म्हणून ह्या व्यक्तिरेखा आलेल्या असतात. त्यांचा तितकाच सहभाग व्हायला हवा असतो. एखादा नायिका प्रधान सिनेमा पहिला तर कळेल, काय होत ? सासू नणंद सुनेला छळतात म्हणजे सुनेच्या व्यक्तिरेखेला उठाव आणतात, सुनेच्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती sympathy निर्माण करतात. मग एखादा दीर (नवऱ्याचा लहान भाऊ)  तिला काहीतरी मदत करतो, कशी मदत करतो हे दाखवता दाखवता आपण दिराचीच कथा सांगू लागलो तर मोठा गोंधळ होईल. सुनेची कथा शेवटा पर्यंत सुने सोबत पोहोचली पाहिजे. सुनेवर झालेल्या अन्यायाचा यथार्थ बदला घेतला गेला पाहिजे किंवा जो काही शेवट लेखकाला भावतो तो झाला पाहिजे.
तसा खलनायक ही सहाय्यक च असतो असे म्हटले पाहिजे कारण तो सुद्धा विरोधातून नायकाचे व्यक्तिमत्व उठावदार करीत असतो.
हे सगळ करतांना नायकाला इतका जास्त वाव दिला जावू नये की तो वास्तविक (natural) वाटणार नाही. म्हणजे उदा - नायकाची आई नायका वर अतिशय प्रेम करते. सकाळी ती त्याच्या साठी नाश्ता करून देते. तेव्हा ती त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट देते त्याचे पाठीवरून हात फिरवते. “घे रा बाळा नाश्ता, कर नीट चावून खा इ. बोलते तो खातो आहे तो पर्यंत त्याच्या जवळ बसते. असे दाखवले तर ते नाटकी वाटेल. पण या उलट तिन  नाश्त्याची डिश ठेवून निघून जात  “लग्न कर पटकन आणि माझी ह्या व्यापातून सुटका कर !आता खूप केल तुमच, मलाही रिटायर होवू दे !” तर ते जास्त natural वास्तविक वाटेल. सर्व characters नायाकाचीच वरवर करत राहिले तर ते कंटाळवाण ही वाटेल.
तर सांगण्याचा मुद्दा काय तर नायकाला सोडायचं नाही आणि अति धरूनही ठेवायचं नाही. त्या प्रमाणे सहाय्यक व्याक्तीरेखाचा ही तोल सांभाळायचा !
एप्रिल २५

बुधवार, २४ एप्रिल, २०१३


उपयोगी संकटे ( Benefit from Problems)
चित्रपट लेखकाला संकटांच्या इतक दुसर काहीही उपयोगी येत नाही. लेखकाला बरीच संकट अशी हाताशी ठेवावी लागतात. कारण गोष्ट मुळात संकटा शिवाय बनत नाही. आणि खुपदा व्यक्तिरेखाला character ला त्याचा स्वभाव दाखवण्या साठी, प्रेम दाखवण्या साठी, तिरस्कार दाखवण्या साठी छोट्या मोठ्या संकटांचा आधार घ्यावा लागतो. कथा सशक्त करण्यासाठी संकट खूप उपयोगी असतात. पण म्हणून नुसती संकटांची रेलचेल नको व्हायला ही काळजी घेतली पाहिजे. आपल्या  MDQ (major dramatic question) पासून आपण भरकटायला नको. व्यक्तिरेखेला त्याचे आवश्यक ते गुण अवगुण दाखवून होताच ती समस्या आटोपून मूळ प्रश्नाकडे वळता आले पाहिजे.
उदा, आपण पूर्वी नोकराचे मालकावर रागावणे आणि नोकरी सोडून जाणे दाखवले आता त्याला दुसरी नोकरी मिळाली कि नाही ? त्याच्या आर्थिक परिस्थिती चे काय झाले हे जर मूळ प्रश्नाशी निगडीत नसेल तर त्याला तिथेच सोडले पाहिजे. आपण नोकराची कथा सांगत नाही आहोत. आपण मालकाची गोची करण्यासाठी नोकराची योजना केलेली आहे. तेव्हा आपण मालका ची गोची झाली आणि त्याचे पुढे काय होते याचा विचार करणे महत्वाचे आहे. ह्या चर्चेचा उद्देश हा की कोणत्या संकटा वर आपण किती वेळ खर्च करायचा ? किती महत्व द्यायचे ह्या बद्दल जागरूकतेने काम करावयाचे आहे.
जेव्हा केव्हा आपल्याला व्यक्तिरेखे बद्दल काही महत्वाचे सांगायचे असेल तर ते सांगण्या पेक्षा ते दाखवता येईल अश्या संकटात त्या व्यक्तिरेखेला टाकावे, पण वरील MDQ विसरण्याचा धोका सांभाळून. कुठल्या संकटाचा किती आधार घ्यायचा आणि समर्पक पाने त्याला बाजूला कसा सारायचा हे काम खुबीने करता आले पाहिजे.
संकटे आणतांना ती खूप तर होत नाहीत ना ? याचा विचार ठेवावा. काहीतरी महत्वाचे सांगण्या साठी संकटे उपयोगी आहेत पण कथेमध्ये सगळ्याच गोष्टींना खूप महत्व देत येत नाही. दुसरा एक धोका असा असतो की एक लहानशी महत्वाची बाब सांगण्यासाठी आपण जे संकट आणतो आहोत ते  मूळ प्रश्ना (जो कथेचा MDQ आहे ) पेक्षा े मोठे व्हायला नको. नाहीतर आपला plot आलेख चुकेल. क्लायामक्स climax हाच सर्वोच्च बिंदू असायला हवा. कारण आपल्याला क्रमाने लहान सहान संकटांना तोंड देत मोठ्या संकटा कडे जायला आवडेल. मोठ्या संकटाला तोंड देवून मग लहान संघर्ष बघण्यात मौज वाटणार नाही.
आणि महत्वाचे तो मोठा संघर्ष नायकाला करायला मिळायला हवा असतो. आपल्या कथेचा आलेख हा नेहमी चढता असावा. अशी हि संकटाची मदत आहे जी लेखकाला संकटात ही आणू शकतो. काही संभाव्य शक्यता आपण लक्षात ठेवू
१ लहान बाबी साठी मोठे संकट आणू नये.
२ मोठ्या नाट्यपूर्ण प्रश्नाकडे दुर्लक्ष होवू देवू नये.
३ घटनांचा क्रम उताराकडे जावू नये.
४ आपण आणलेले संकट दुसऱ्या एखाद्या character ला मारक ठरू नये.
५ ते संकट सयुक्तिक असले पाहिजे. ओढून ताणून आणलेले वाटू नये.
६ संकटाचा मोह टाळावा .

एप्रिल २४

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा चे आपापसातील संबंध ( Interrelations of characters )

एका कथे मधल्या सर्व व्यक्तिरेखा चा एकमेकाशी काहीनाकाही संबंध असतो च. मैत्रीचा असेल रक्ताच्या नात्याचा असेल, दुष्मनी असेल ! अनोळखी असणे हा देखील संबंध असतो. मग त्यांना एकमेका बद्दल काय वाटते ? हे कथे च्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे असते. एक दोन character असे असतील कि जे संपूर्ण कथेमध्ये एकदाही भेटत नाहीत. पण सहसा सर्वांचा एकमेकांशी उल्लेख करण्या इतका तरी संबंध जरूर येतो. त्यांना एकमेका बद्दल काय वाटते हे सांगत बसलो तर कथा खूप लांब होणार. त्यात शॉर्ट कट कसे वापरायचे ते नंतर पाहू. पण सर्व characters चे एकमेका बद्दल चे मत विचार लेखकाच्या माइंड मध्ये स्पष्ट clear असायला हवेत. ज्या वेळी तुम्ही संवाद लिहाल त्यावेळी जागा सापडते तिथे ते त्या पद्धतीने व्यक्त करू शकता. त्याच्या त्या छोट्याश्या उल्लेखाने त्याच्या स्वभावाला उठाव मिळू शकतो, अश्या बारीक सारीक हालचाली आणि वक्तव्यांनी words character ला जिवंत पणा येतो. कथेला बळ मिळते. ती अधिक स्पष्ट प्रभावी होते.
आपल्या दोन्ही हातांच एकमेकाशी जे coordination असत तसाच हे आहे.
विशेषत: वैचारिक मतभेद किंवा साहचर्य दाखवणे जर जास्तच कठीण असते. जे जे काही वैचारिक आहे ते सांगणे सोपे असते पण दाखवणे खूप कठीण असते. एखाद्या character  ला कुणाचा राग आला तर तो सांगणार नाही की मला राग येतो आहे. तर तो काहीतरी वस्तू फेकून देईल. नजरेने तसे दर्शवून देईल. म्हणजे काय तर त्याला कृती द्यावी लागेल तरच  त्याची ती अभिव्यक्ती प्रभावी ठरेल. अन्यथा आपण फक्त बोलून सांगितले कि त्याला राग येतो आहे तर ते परिणाम करणार नाही.
समजा हिरोला प्रेयसीची आठवण येते आहे. गाणे टाकावे हा अतिशय सोपा प्रकार आहे पण तितका वेळ नसेल तर काय करणार ? तो स्वत:ची बोलतो कि मला तुझी आठवण येते आहे ! किंवा तो तिचा फोटो पहात बसेल ! खिडकीतून आकाशातला चंद्र बघेल ! हातात फोन घेवून तिला फोन करू का ? तिचा नंम्बर काढेल ! इ. कृती दाखवली तरच तो प्रभावी ठरेल. सिनेमा हे दाखवण्याचे मध्यम आहे. आणि आपसातील संबंध विचार दाखवण्या तून ह्या छोट्या गोष्टीनी  सिनेमा  मोठा होतो.

एप्रिल २३

सोमवार, २२ एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा आणि कथा (Character and Story)

आपल्या व्यक्तिरेखा characters आपली गोष्ट सांगतात. आपण त्याच्या तोंडून बोलतो जणू आपण बोलतच नाही, आपण त्यांना बोलायला लावतो. जणू हि त्यांचीच गोष्ट आहे. आपण त्यांना जीवंत करतो, काही काळापुरत का असेना त्या अर्थाने ती गोष्ट आपली न रहाता त्यांची होते. अगदी तसेच जसे ईश्वराने ( किंवा ज्या नैसर्गिक निर्मिती करणाऱ्या शक्तीला आपण मानतो ती) आपणाला जन्म दिला, हे शरीर दिल, मन दिलं, आपण जिवंत आहोत पण स्वतंत्र आहोत. आपण काय कराव हे आपण ठरवतो. आपण काय बोलाव ते आपण बोलतो. ती शक्ती (ईश्वर) आपल्याला बळजबरी करीत नाही कि आपण काय बोलावे ? कसे वागावे ? इ. आपण गाणे ही गावू शकतो किंवा शिव्याही देवू शकतो. पुण्य करण्या इतकीच आपल्याला पाप करण्याची ही मोकळीक आहे. आपण तसे करू नये हे तितकेच खरे !
मुद्दा असा कि आपल्या characters ना आपण तशी मोकळीक दिली तरच ते जिवंत वाटतील आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी आपली गोष्ट स्वत:ची गोष्ट सांगतो आहोत तशी सांगितली पाहिजे. त्याची गोष्ट वेगळी आणि आपण सांगत आहोत वेगळ तर गडबड होईल. प्रत्येक character आपली ठरलेली गोष्ट सांगणार असायला हव असत. त्याचा तेवढा भाग त्याने इमाने इतबारे सांगावी. म्हणजे लेखकाने त्याला तितकच स्वातंत्र द्याव, आणि अस द्याव कि जणू तो पूर्ण स्वतंत्र आहे. कदाचित तो एका सीन साठी येणार असेल पण त्याचा कार्यभाग त्याच्या दृष्टीने परिपूर्ण असावा. मग एका सीन मध्ये येणारा नोकरही मालकाला झापतो आणि लक्षात राहून जातो.
व्यक्तिरेखा आपली गोष्ट पुढे नेणारी असली तरच ती व्यक्तिरेखा जिवंत वाटते, लक्षात रहाते. आणि विशेष म्हणजे आपली गोष्ट यशस्वी होते. गोष्ट म्हणजे सिनेमा चा आत्मा आहे. बाकी सारे काही शरीर किंवा कपडे अलंकार इ. शरीर आकर्षक तेजस्वी तितका आत्मा सुंदर असणारच म्हणून शरीराला सुंदर करण्याचा शक्य तितका प्रयन्त करावाच पण आत्मा निस्तेज असेल तर शरीरला कितीही कपडे अलंकार घातले तरी काहीही उपयोग होणार नाही. सगळा प्रयन्त आत्मा तेजस्वी करण्यासाठी करावयाचा आहे. त्यात व्यक्तिरेखा सर्वात महत्वाचा भाग आहेत. म्हणजे समजा की व्यक्तिरेखा characters हे शरीर आहेत. हात पाय आहेत. ते मूळ शरीराचे च असावेत. कुणाचे हात कुणाचे पाय असा प्रकार जितका विचित्र असेल तितकेच character चे सुद्धा कथेशी आहे.
story सर्वार्थाने त्या characters ची झाली पाहिजे !!

एप्रिल २२

रविवार, २१ एप्रिल, २०१३


हेच ध्येय का ? (Why)

कधी किंवा बर्याचदा लेखक व्यक्तिरेखेला Want ध्येय तर देतो, पण ती त्या character ची स्वाभाविक want झाली पाहिजे. ते त्याचे खरोखर ध्येय आहे असे वाटले पाहिजे, प्रेक्षकांना ते उसन घेतलेलं आहे अस वाटू नये. आपल्याला जर कुणी सांगितलं, खूप पटवून आग्रहाने सांगितलं की तू हे काम कर ! पण जोवर ते आपणास पूर्णत: पटत नाही तो पर्यंत आपण ते करणार नाही. त्याच प्रमाणे आपण character ला दिलेले ध्येय त्याला पटलेले आहे असे वाटले पाहिजे . त्याच्या परिस्थितीला त्याच्या पूर्व अनुभवांना त्याच्या सर्व घटकांना ते संयुक्तिक झाले पाहिजे . हा भाग जरा जास्तच कठीण आहे पण एकदा का आपण आपल्या निर्मिलेल्या व्यक्तिरेखा शी संवाद करायला शिकलो कि ही गोष्ट सोपी होते.
हे सहज साध्य करण्या साठी एक प्रयोग आहे तो करावा. आपली गोष्ट नक्की झाली की ती दोन चार पानात लिहून काढावी. महत्वाच्या व्यक्तिरेखा समोर येतात. त्याच्या want हि निश्चित होतात. त्या प्रत्येक व्यक्तिरेखे चा पूरब इतिहास तयार करावा. जसे नायक समजा त्याचे वय २५  वर्षे असेल तर त्याचा मागील दहा वर्षाचा इतिहास लिहून काढावा. साधारण महत्वाच्या काय घटना ह्याच्या मागील दहा वर्षात घडल्या असतील ? तसेच त्याच्या ही मागील दहा वर्षात काय घटना घडल्या असतील ह्याच प्रमाणे जन्मा पर्यन्त चा काल्पनिक इतिहास तयार करावा. शक्य आहे हा इतिहास आपण पडद्यावर आणणार नाही आहोत. पण तरीही तो पडद्यावरील घटना नक्कीच बलवत्तर करेल. आणि त्याचे ध्येय नक्की करण्यास मदत करते  किंवा ध्येयाला बळकटी आणते.
हा असा व्यक्तिरेखेचा इतिहास तयार केला तर आपल्या व्यक्तिरेखा आपल्या पासून वेगळ्या होतात. आपल्या व्यक्तिरेखा म्हणजे जणू आपल्या प्रतिमा असायला नकोत. आपण त्याचे अनुभव जाणतो, त्याच्या ह्या इतिहासा वरून त्याचा तयार झालेला स्वभाव जाणतो. त्याच स्वरूप आपल्या डोळ्या समोर येवू लागत. हि  व्यक्ती जाड असेल कृश असेल ? कि बुटकी किंवा उंच असेल ? कसे कपडे वापरेल ? केस कसे ? मिशी कशी ? याचे मित्र कसे असतील ? सगळ्या गोष्टी हळूहळू व्यक्त ह्यायला लागतात. आणि मग कुठे काही शंका आली की ह्या अश्या वेळी हि व्यक्ती काय करेल ? तर आपण विचार करू लागलो कि ती आपल्या आतून बोलू लागते मी अमुक वेळी अशी वागले मग आता मी अशी कशी वागेल ? मला हे असच कराव लागेल आणि आपल्यालाही ते मग पटत. निर्विवाद मत तयार होत. अश्या प्रकारे आपल्या मनात व्यक्तिरेखा character च स्वरूप पक्क झाल आणि सगळे characters स्पष्ट झाले कि मग कथा हि तितकीच स्पष्ट होते. सर्व घटनांना सबळ पाठ पुरावा मिळतो. व्यक्तिरेखा ना कंगोरे मिळतात. आणी  त्या जिवंत होतात.

एप्रिल २1

शनिवार, २० एप्रिल, २०१३


व्यक्तिरेखा (Characterisation)

तुमची कथा तुम्ही सांगू शकत नाही. केवळ तुम्ही ती सांगितली तर ती तितकी रंजक होणार नाही. कधी एके काळी एक राजा होता, असे म्हणताच तुम्ही ऐकणार्याच्या डोळ्या समोरून नाहीसे होता त्याच्या डोळ्या समोर तो काळ आणि तो राजा येतो मग तुम्ही जे जे काही बोलत ते राजा बोलतो कधी राणी बोलते तर कधी राजकन्या आणि अशीच कहाणी पुढे जाते. सिनेमा मध्ये तो राजा आणि तो काळ बारीक सारीक तपशिला सहित दिसतो. प्रेक्षक अवती भवती तो काळ ते ठिकाण त्या व्यक्तिरेखा सर काही तंतोतंत अनुभवतो त्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून जातो. त्यामुळे आपल्या व्यक्तिरेखा character खरोखर जिवंत झाले पाहिजेत. ते जिवंत कसे होतील याचा विचार केला तर सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे विविधता ! वेगळे पण !
आपल्या भोवताली पहिले तर दिसेल किती अफाट विविधता आहे. किती झाड आहेत पण एकही दुसऱ्या सारखे नाही. आपण कथा लिहिताना मात्र ही चूक नेहमी होते कि आपले पात्र characters एकसारखे होतात. सहसा नवख्या लेखक कडून असे होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्या व्यक्ती characters लेखकाच्या सारखच बोलतात. कारण लेखक त्यांना वेगळे पण देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या ते लक्षात च आलेलं नसत. पण जरा विचार केला तर हे त्यालाही पटेल. आणि मग तो ते वेगळेपण आणण्याचा प्रयन्त करेल. तर हा characters ना वेगवेगळे पण देण्याचा पर्यंत तरी कसा करावा ? अगदी सोप्प आहे. व्यवहारात पाहिलं तर प्रत्येक माणसाला काहीना काही तरी हव आहे अस दिसेल. तुमच्या घरी तुमचा जवळचा मित्र किंवा भाऊ ही आला तर काहीतरी कामानिमित्त आलेला असतो. माणसाची प्रत्येक क्रिया activity काहीतरी उद्देशाने होत असते. आपल्या कथे मध्ये प्रत्येक character ला हा उद्देश दिला तर त्याच्या मध्ये त्याच वेगळे पण जरूर दिसेल. आपल्या सर्व (साधारणत: ज्यांना संवाद आहे अश्या सर्व) व्यक्तिरेखांना characters ना उद्देश (Goal) द्यायला हवा आहे. यालाच characters want असही म्हणतात. जशी हि want उद्देश असेल त्या प्रमाणे ती व्यक्ती व्यवहार करेल. त्या उद्देशा नुसार ते character दुसऱ्या character कडे जाईल किंवा न जाईल. जाईल तर काय मागेल ? काय बोलेल हे ते character चा स्वत: आपल्याला सांगेल. म्हणजे लेखका च्या आतून ते character सुचित करेल. उदा - पुन्हा लगान, भुवन गोळी कडे जातो त्याला आपल्या टीम मध्ये सामील करण्या च्या उद्देशाने ह्या ठिकाणी भुवन चे ध्येय ठरलेले आहे. पण गोळी चे हि काहीतरी ध्येय असणारच, ते आहे कि त्याला आपली जमीन प्रिय आहे, तिचे रक्षण त्याला करायचे आहे. आणि भुवन हे ओळखून आहे. म्हणून तो त्याला मार्मिक टोमणा मारतो की “ तू काय बाबा एक शेताचा तुकडा विकून लगान भरून टाकशील !” गोळी च्या ध्येयाला ठेच लागते, तो कळवळतो, आणि दुसरा काही मार्ग दिसत नाही तेव्हा भुवनला साथ द्यायला तयार होतो. आता ह्या ठिकाणी विविधतेचा नमुना दिसतो, भुवन ची आणि गोळी ची want ध्येय एक सारखे आहे का ? आहे ……. पण नाही ! कारण त्याच्या मध्ये मुलभुत फरक आहे. भुवन कडे दूरदृष्टी आहे. धैर्य आहे. त्याने सर्व गावकर्यांच्या विरोधात इग्रजांच्या अधिकार्याशी ह्या लढाई ची निवड केली आहे. पण गोलीला फक्त आपले स्वत:चे शेत जमीन वाचवायची आहे. अश्या प्रत्येक खेळाडू मध्ये वेगळे पण दिसते. भुरा हा स्तुतीने भाळून टीम मध्ये येतो, इस्माईल च्या येण्याच कारण आणखी वेगळ आहे, की इंग्रज बाई भुवनला मदत करते आहे आणि आपण गाववाले असून हि वेगळे का ? ह्या प्रश्नाने भंडावून तो येतो. तर लाखा फितूर खेळाडू  बनून येतो. टीम बनते ११ खेळाडू येतात पण प्रत्येकाच्या want ध्येयामध्ये फरक आहे, विविधता आहे. त्यामुळे ते सगळे जिवंत वाटतात. त्याच्या मुळे कथा जिवंत होते. आणि प्रेक्षक भारावून बघतात ……………….  पुन्हा पुन्हा !

एप्रिल २0

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३


अव्दितीय (Uniqueness )


"The structural unity of the parts is such that, if any one of them is displaced or removed, the whole will be disjointed and disturbed. For a thing whose presence or absence makes no visible difference is not an organic part of the whole." - Aristotle
कोणत्याही निसर्ग निर्मित वस्तू मधील एखादा भाग जर काढून टाकला किंवा जागा बदलून दुसरी कडे लावण्याचा प्रयन्त केला तर काय होईल ? समजा आपल्या शरीरा वरील हात काढून पायाच्या जागी लावला कान डोळ्याच्या जागी बसवण्याचा प्रयन्त केला तर सगळी गडबड होवून जाईल. वरील अरीस्टोटल चे विधान हेच सांगण्या चा प्रयन्त करते.  अव्दितीय एकजूट (unity) अशी असते कि त्यातून जर त्याचा एखादा भाग काढून टाकला किंवा त्याची जागा बदलली तर त्याच्या संपूर्ण अस्तित्वा मधेच गडबड होते. या विरुद्ध असेही म्हणता येईल की ज्या एका भागाच्या काढून टाकण्य मुळे किंवा एका भागाची जागा बदलण्या मुळे त्याच्या संपूर्ण अस्तित्वात काहीही फरक पडत नसेल तर तो भाग अद्वितीय भाग नाही . तो भाग तितका महत्वाचा नाही. निसंकोच पाने तो ताबडतोब काढून टाकावा.
एक उत्कृष्ट स्क्रीन प्ले चे ही तसेच आहे. एखादा सीन काढून टाकला तरीही त्या कथेच्या परिणामात काहीच फरक पडत नसेल तर तो सीन कुचकामी आहे तो तात्काळ काढून टाकावा. एखाद्या सीन ची जागा बदलली तरी त्याचा परिणाम बदलेल आणि जर बदलत नसेल तर तो सीन काहीही कामाचा नाही. सिनेमा ची कथा पुढे न नेणारे एखादे वाक्य सुद्धा लेखकाने खपवून घेवू नये. तरच तो सीन अद्वितीय बनू शकेल आणि अश्या अद्वितीय Unique सीन्स नि मिळून उत्कृष्ट स्क्रीन प्ले बनू शकेल.
हा Uniqueness सीन मध्ये आपल्या सिनेमा मध्ये आणणे खूप कठीण असते. Unique म्हणजे एकमेव अद्वितीय म्हणजे त्याच्या सारखा तोच, त्याच्या सारखा  दुसरा नाही. अनेक गोष्टींचा पाठ पुरावा करता करता कुठेतरी एक दोन गोष्टी अश्या सापडतात ज्या एकमेव असतात. अश्या गोष्टी सुचणे हि देखील आपल्या हातातली गोष्ट नाही. हुकमी रीतीने असे काही लिहिता येत नाही. ते खूप विरळ कधी तरी योगायोगाने सुचते.  ती ईश्वरी कृपा असते, कधी तरी आपल्या डोक्यात लकाकते आणि लेखकाला धन्य करून जाते. आपण पाठ पुरावा करीत राहणे एवढेच आपल्या हाती असते.

पुढील भाग पासून आपण characterisation व्यक्तीरेखा कशी परिपूर्ण घडवावी ह्या विषयी च्या अभ्यासाला सुरुवात करू. माझ्या ह्या लिखाणा चा कोण कोण उपयोग करीत आहे ? जे जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपया वाचकांनी मला माझ्या ई-मेल आयडी वर मेल करावेत आणि आपली ओळख वाढवावी  हि विनंती.

एप्रिल 19  

बुधवार, १७ एप्रिल, २०१३


कथेशी सीनचा संबंध (Relation to the Story)

  केवळ अमुक एका सिनेमात गाजलेला म्हणून  किंवा माझ्या सुपर स्टार ला आवडतो म्हणून  तश्या प्रकारचा तसा वाटणारा सीन टाकणे सृजनशील Creative लेखकाला कधीच रुचणार नाही. तो त्या सीन वरून आणखीन पुढचा विचार मांडून काहीतरी आगळा वेगळा सीन तयार करण्याचा Develop प्रयन्त करेल आणि प्रयन्त करेल तर यशस्वी देखील होईल. आणि तो त्याही पेक्षा जास्त प्रशंसा मिळवून जाईल. खरे पाहता शोर्ट कट हा फार नुकसान करणारा मार्ग आहे. तुमच्या प्रतिभा शक्तीचा अवमान तर हा करतोच पण तिला तो हळू हळू निकामी देखील करू शकतो. म्हणून कधी ही असे डुप्लिकेशन चे काम करू नये. थांबा वाट पहा ……… खूप वेळ वाट पहावी लागली तरी वाट पहा. काहीतरी नवीन सुचेल. पण जर तुम्ही तडजोड compramise केले कि मग तुमची प्रतिभा गप्प बसेल. पण जर तुम्ही अडून बसलात कि नाही हे होवून गेलेले आहे मला काहीतरी नवीन हवे आहे जे माझ्या कथेशी प्रामाणिक आहे.
तेच मला सांगितले पाहिजे. मला माझ्या कथेसाठी काम करायचे आहे. माझ्या कथेला पुढे नेणारा, कथेला परिणाम कारक करणारा सीन मला टाकला पाहिजे अन्यथा तो सीन लिहू नये किंवा वगळून टाकावा. पुन्हा पुन्हा वाचून सीनचा कथेशी संबंध दृढ आहे  की नाही तपासून पाहावे. हा सीन नसला तर काय होईल ? कोणते माहिती प्रेक्षकांना मिळणार नाही आणि त्याचा कहाणी समजण्यात काय समस्या येवू शकेल याचा तपशील पाहून त्या सीन ची योग्यता ठरवावी.


स्थळ (Location)


हा सीन कोणत्या ठिकाणी Location घडावा ? कोण कोणत्या ठिकाणी हा सीन घडू शकतो ? संभाव्य ठिकाणांची यादी करावी. प्रत्येक ठिकाणी तो कसा घडेल याची मनोमन उजळणी करावी. कुठे घडला तर तो जास्त परिणाम कारक वाटतो. तुम्हाला तो कुठे घडलेला भावतो ……. नोंद करावी. शंका वाटत असल्यास एखाद्या मित्राला मैत्रिणीला विचारावे की असे असे तुला करायचे असल्यास तू कुठे जाशील ? जसे प्रेमभंगाचा सीन असेल उंच बिल्डींग च्या टेरेस वर कि समुद्र किनारी  कि रेल्वे प्लट फार्म ? शोध घेणे महत्वाचे असते. बर्याचदा आपण आपणाला भावणारा निर्णय आपण पटकन घेतो. पण एक सदोदित लक्षात असू द्यावे सिनेमा हा आपल्या साठी नाही ………… कधीच नाही. तिथे आपल्या व्ययक्तिक आवडी निवडीला किंचितही जागा नाही आणि ती नसावी. Third Eye नेहमी वापरला पाहिजे. कि हे कसे दिसेल ? प्रेक्षकांना कसे दिसेल ? आवडेल कि नाही ? त्यांना ह्यात वेगलपणा दिसला पाहिजे आणि तो भावला पाहिजे. आणि location मधला वेगळे पणा शोधण तितकस कठीण नसत. भरपूर वेगवेगळी locations उपलब्ध असतात.


काळ (Time)

हा सीन कधी घडला पाहिजे काहीवेळा पेक्षा बर्याच वेळा काळ म्हणजे सकाळ कि सायंकाळ, दिवसा की रात्री ह्याची उत्तर सोपी असतात. जस ऑफिसला जाणार म्हणजे दिवसाच असेल पण काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण करता येवू शकते कि तो रात्री ऑफि मध्ये आहे. ह्या रात्रीच्या वेळी ऑफिस मध्ये असण्याने वेगळे नाट्य गवसते. का हा रात्री ऑफिस मध्ये आला असावा ? काहीतरी गफला करणार असेल ? काहीतरी झालेला गफला कसा झाला हे शोधत असेल ? अश्या प्रकारे बऱ्याच प्रकारचा वेगळे पणा  शकतो आणि आपल्या कथे मध्ये नाट्य पूर्ण प्रसंग आणता येतात. तसेच काहीवेळा हा सीन रात्री चा का किंवा दिवसच का इ. गोष्टींचा तपशील द्यावा लागतो आवश्यकता असेल तसा तो द्यावा. काळ आपल्या सीन मधील दृश्यात वेगळा रंग भरू शकत कारण काळा  नुरूप वेळेनुसार प्रकाश योजना बदलते आणि प्रकाश सिंचे स्वरूप आमुलाग्र बदलू शकतो.


april 17



सीन आणि व्यक्तिरेखा (Scene and Character)

आपल्या सीन मध्ये व्यक्तिरेखा कशी दाखवली गेली आहे ? ती तशी दाखवणे  योग्य आहे का ? काही प्रश्न विचारात घ्यावेत -------- विनिमय करावा. आपल्या character मूळ स्वभाव तसाच आहे की तो कुठे बदलला गेला आहे. जसे कि तो आई वर प्रेम करतो पण ह्या सीनमध्ये तो आई शी भांडतो ! का भांडतो ? त्या भांडणाचे कारण प्रेम असेल तरी चालेल किंवा त्या भांडणा मुळे प्रेमात वाढ होणार असेल ? किंवा आई मुला मध्ये दुरावा निर्माण करणे हि कथेची गरज असेल ? किंवा आणखीन काहीही योग्य कारण असेल ! पण ते कथेला पोषक नसेल तर तो सीन बदलणे आवश्यक होईल.
सीन व्यक्तिरेखा character ची ओळख करून देतो तेव्हा ती ओळख योग्य प्रकारे झाली आहे का ? महत्वाच्या character ची ओळख लक्षणीय व्हायला हवी असते. तसेच इतर characters ची ओळख लक्षात राहील अशी झाली पाहिजे.

एखादा सीन एखाद्या खूप लहान व्यक्तिरेखेचा होवून जातो तर तो खरोखर त्याचा होतो आहे का ? मागे नोकर आणि मालक असे उदाहरण दिलेले आहे. त्यावेळी त्या नोकराला न्याय दिला गेला पाहिजे. कारण नोकर पुन्हा स्क्रीन वर येणार नाही पण त्याच्या ह्या सीन मुळे मालकाच्या पुढील सीनचा परिणाम वाढणार आहे. अश्या प्रकारे सर्व सीन मिळून सिनेमा यशस्वी करणार असतात. त्या त्या सीन मध्ये त्या त्या व्यक्तिरेखांना न्याय मिळायला हवा असतो.
सीन च्या सुरुवातीला character मानसिक दृष्ट्या कुठे आहे. आणि सीन च्या शेवटी तो कुठे पोहोचला हा प्रवास योग्य आहे कि नाही ? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याचे उत्तर लेखक कडे असायला हवे. character चे संवाद dialogue समर्पक आहेत की नाही याची पडताळणी केली पाहिजे. शूटिंग च्या वेळी बरेच dialogue बदलतात पण ते तसेच्या तसे बोलले गेले पाहिजेत. सगळ्या व्यक्तिरेखा एकसारख्या वाटायला नकोत. त्याच्यात सौम्य तरी मतभेद असायला हवेत. दोन लोकांच देखील कधी सर्व बाबतीत एकमत आढळत नाही हे लक्षात ठेवाव.
प्रत्येक character च आपल स्वत:च ध्येय असत ते ह्या सीन मध्ये जपल गेल आहे का ?
MDQ चा संघर्ष वाढता आहे की नाही ?
नकारात्मक भूमिका संघर्ष वाढवत आहेत कि नाही ?
ह्या सीन ची सुरुवात मागील सीन च्या शेवताशी सुसंगत  आहे की नाही ?
ह्या सीन चा शेवट पुढील सीन च्या सुरुवातीशी जुळेल कि नाही ?
सीन मध्ये दृश्य visual भाग अपेक्षित परिणाम आणेल का ?
त्यातले आवाज sound कसे असतील ? ते परिणाम साधतील का ?
सीन मध्ये characters काही कृती  business द्यावी का जी सीन मधल्या content ला पूरक effective असेल.
मागील सीन आणि ह्या सीन मध्ये कथेचा किती काळ गेला आहे ? सहसा flash-back scene दाखवतांना हे जास्त महत्वाचे असते. तो कश्या प्रकारे लक्षात आणून दिला जातो आहे ?
ह्या सीन चा मूड serious comedy anger etc व्यवस्थित व्यक्त होतो आहे का ? हा मूड भाव सर्वात जास्त महत्वाचा कारण हा मूड प्रेक्षका मध्ये येणे आणि शेवटा पर्यंत टिकून रहाणे हेच चित्रपटाचे यश असते.


एप्रिल 18


मंगळवार, १६ एप्रिल, २०१३


आपला सीन आपण लिहावा आणि खालील प्रश्न स्वत:ला विचारून पहावेत, ह्या प्रश्नाच्या उत्तरात आपल्या लिहिलेल्या सीन चा दर्जा आपणास कळतो,  

१) ह्या सीन ची गरज किती आहे ? (purpose of the Scene )

    आपला लिहिलेला सीन वाचतांना विचार करावा की ह्या सीन मुळे काय माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे ? कोणत्याही सीन मधून फक्त दोन प्रकारची माहिती देता येवू शकते. एक कथा पुढे सरकते किंवा  एखाद्या व्यक्तिरेखे बद्दल अधिक माहिती पुरवते. ह्या व्यतिरिक्त काहीही जर सीन मध्ये माहिती content असेल तर ती उत्कृष्ट स्क्रीन प्ले ला घातक आहे असे समजावे.

ह्या सीन मधून आपली किती आणि कशी पुढे सरकणार आहे ?
उदा - लगान सुरुवातीला येणाऱ्या प्रत्येक सीन मधून एकेक गोष्ट कळत  जाते की दुष्काळ पडलेला आहे …… दुगुनी लगान द्यावी लागणार आहे. इग्रज ऐकणार नाहीत अश्या प्रकारे परिस्थितीचे गांभीर्य seriousness वाढत जाते. हळूहळू एकेका सीन मधून आपण MDQ मोठ्या महत्वाच्या प्रश्ना कडे जातो. कधी कथेला वळण देणारा सीन येतो कधी उंची देणारा सीन येतो. ज्या सीन मध्ये कथा पुढे सरकत नाही तीच तीच माहिती एका character दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला सांगत असेल तर कथा तिथेच थांबलेली असते. प्रेक्षक खोळंबतो आणि कथेची पकड ढिली होते. कथा वेगवेगळ्या प्रकारे पुढे सरकवता येते. पहिल ध्येय हे असाव कि आपल्याला प्रेक्षकाना MDQ कडे न्यायचं आहे. एक एक पायरी ने आपल्याला महत्वाच्या मोठ्या प्रश्नाची ओळख करून द्यायची आहे. आपले सीन एका मागे एक असे यावेत कि हे ध्येय साध्य व्हायला हवे. कुठल्याही यशस्वी चित्रपटात हेच आढळून येईल. पण प्रत्येक फिल्म मेकर हे आपल्या वेगळ्या स्टाइल ने करीत असतो. कधी तो MDQ आधी सांगतो आणि मग स्पष्टीकरण देत जातो की हा सगळा काय प्रकार आहे. तर कधी तो हळू हळू MDQ कडे पायरी पायरीने नेतो. किंवा आणखी काही प्रयोग करतो.

दुसरी गोष्ट सीन मधून कळते ती व्यक्तिरेखे बद्दल ची माहिती. आपण character बद्दल काय माहिती देतो आहोत ? ती कहाणी शी किती संबंधित आहे ? आता लगान मधलाच एक सीन आहे वर वर पाहता तो तितकासा महत्वाचा वाटत नाही. भुवन ची एन्ट्री ……… रसेल हरिणांची शिकार करतो आहे आणि भुवन हरणांना सावध करतो. ह्या ठिकाणी भुवन ची भूतदया (sympathy for nature and animals) दिसते. तसेच तो पुढे काहीतरी क्रांती करणार आहे त्याची बंडखोरी सुद्धा दिसून येते. जी पुढे कथेमध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. अश्या प्रकारची चुणूक दाखवली तर सीन सार्थकी लागतो. पद्धती वेगवेगळ्या अनेक असू शकतील. पण परिणाम कारकता effectiveness टिकवला पाहिजे. सिनेमाच्या सुरुवातीला व्यक्तिरेखांची characters ची माहिती जास्त प्रमाणात द्यावी लागते. कधी कधी character खूप जास्त असतील तर निवेदन narration वापरून वेळ वाचवला जातो. काही वेळा आपली व्यक्तिरेखा काही काळानंतर आपले वेगळे रूप दाखवणार असते तशी कथेची गरज असू शकते. त्या वेळी योग्य ती खुबी वापरून आपले सीन लिहायला हवेत. म्हणजे जी माहिती आता सांगायची नाही ती सांगणारे सीन किंवा त्यातला काही भाग वगळावा.

april 17

सोमवार, १५ एप्रिल, २०१३


सीन (Scene)

A Scene is a unit of story that takes place in a single location during a continuous period of time.
सीन हा सिनेमा च्या कथेचा एक भाग असतो जो एका सलग कालावधीत एका निश्चित ठिकाणी घडतो.
आपली कथा सांगण्यासाठी वेगवेगळ्या स्थळांची आपल्याला गरज असते. उदाहरणार्थ नायकाचे घर, ऑफिस नायिकेचे घर बगीचा इ. ह्या वेगवगळ्या ठिकाणी चित्रीकरण करावे लागणार असते. चित्रीकरणाच्या shooting च्या  सोई साठी ही विभागणी खूप उपयोगाची असते. एका वेळी एक दृश्य शूट केले जाते ज्याचे एक निश्चित स्थळ location असते. आता एका ठिकाणी चित्रीकरण करीत असतांना असे होवू शकते कि समजा नायकाच्या घरी सकाळी १० वाजता एक सीन आहे ज्यात नायक ऑफिस ला जातो  आणि नंतर सायंकाळी नायक परत येतो हा सीन आहे. हे दोन्ही सीन एकाच वेळी सलग शूट करता येणार नाहीत. कारण त्यात प्रकाश योजना बदलावी लागेल. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत झालेले बदल दाखवावे लागतील आणि ह्या साठी तो सीन वेगळा लिहावा लागेल. जरी ते दोन्ही सीन एकाच लोकेशन वर आहेत तरी. म्हणजे काय तर location बदलले किंवा वेळ बदलली कि सीन बदलावा लागतो. उदा - नायक हॉल मधून निघाला पहिला सीन, जिना उतरला दुसरा सीन, पार्किंग मधु कार घेवून निघाला तिसरा सीन. ह्या प्रमाणे.
ही झाली अगदी बेसिक माहिती, सीन कसा असावा ? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि उत्तर अगदी सोप्प आहे. प्रेक्षकांना काहीतरी अधिक माहिती प्रत्येक सीन मधून मिळाली पाहिजे. समजा पहिल्या सीन मध्ये कळले कि नायक ऑफिस ला जातो आहे. दुसऱ्या सीन मध्ये तेच आपण सांगतो आहोत की नायक ऑफिसला जाण्या साठी जिना उतरतो आहे. ठीक आहे त्याला किती घाई आहे हे दाखवले पण तिसऱ्या सीन मध्ये तेच की नायक ऑफिसला जाण्या साठी कारने निघाला आहे. असे तीच तिच माहिती देणारे सीन उगाच वेळ घालवतात. प्रेक्षक अगदी कंटाळला नाही तरी त्याच्या वरची कथेची पकड ढिली होते. अनावश्यक सीन नको हि सुद्धा एक प्राथमिक बाब आहे. खरे म्हणजे सीन मध्ये आपली स्वत:ची एक ताकद असली पाहिजे. प्रत्येक  नाही पण बऱ्याच महत्वाच्या सीन ला त्याच स्वत:च अस्तित्व असल पाहिजे. तो स्वत:च एक छोट्या फिल्म सारखा स्वतंत्र असला पाहिजे. त्या सीनचा एक वेगळा उद्देश असावा, त्याला हि सुरुवात मध्य आणि शेवट असावा म्हणजे तो आपला परिणाम साधतो. एखादी लहानशी व्यक्तिरेखा त्या सीन साठी हिरो असते. तुम्ही पाहिले असेल सिनेमात एखादा नगण्य नोकर एका सीन मध्ये मालकाला झापतो आणि नोकरी वर लाथ मारून निघून जातो. पब्लिक त्याच्यावर खुश होते. त्या सीन चा तो हिरो असतो. मालक रागावतो इथे तो सीन सुरु होतो, मालक नोकराचा नको तितका अपमान करतो तो टिपेला जातो आणि नोकर आपला स्वाभिमान टिकवण्य साठी नोकरी सोडून जातो. हा सीन स्वत:त परिपूर्ण होतो. असे (स्वतंत्र नाट्य असलेले ) सीन जितके जास्त तितका स्क्रीन प्ले दमदार होतो.
संपूर्ण कथे मध्ये नायकाला जे काही हवे आहे. त्या बद्दल काही प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करणे हे सीन चे काम असते. ते ध्येय नायकाला मिळेल कि नाही ह्या संग्दिध अवस्थेला थोडे सकारात्मक किंवा थोडे नकारात्मक झोके सीन मधून मिळत गेले पाहिजेत. नायक आपल्या ध्येय कडे सरकतो … खलनायक काही तरी कुरघोडी करतो … नायक सावरतो बचावतो … नव्याने प्रयन्त करतो …… कधी नायकाची ताकद वाढते तर कधी खल नायकाची. ह्या मध्ये पुनरावृत्ती असू नये. नव नव्या गोष्टी घडत गेल्या ज्या प्रेक्षकांना आश्चर्य दु:ख आनंद देत त्यांच्या संमिश्र भावना शी खेळत राहतील. तर चित्रपट यशस्वी होवू शकेल.
संपूर्ण चित्रपटात साधारण साठ ते सत्तर सीन असतात पण असा काही नियम नाही.
तसेच एका सीन ची सर्व साधारण लांबी अर्धा पण पासून चार पाच पाना इतकी असते पण असाही काही नियम नाही. त्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी सामग्री असली तर सर्व नियम मोडण्यास हरकत नाही.
सीन मध्ये संघर्ष कसा असावा आणि कसा  आणावा ते पुढे पाहू.
आपल्या प्रश्नाची गरज आहे. कृपया काहीतरी विचार ज्याने संवाद होईल !
april 15


आपला सीन आपण लिहावा आणि खालील प्रश्न स्वत:ला विचारून पहावेत, ह्या प्रश्नाच्या उत्तरात आपल्या लिहिलेल्या सीन चा दर्जा आपणास कळतो,  

१) ह्या सीन ची गरज किती आहे ? (purpose of the Scene )

    आपला लिहिलेला सीन वाचतांना विचार करावा की ह्या सीन मुळे काय माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे ? कोणत्याही सीन मधून फक्त दोन प्रकारची माहिती देता येवू शकते. एक कथा पुढे सरकते किंवा  एखाद्या व्यक्तिरेखे बद्दल अधिक माहिती पुरवते. ह्या व्यतिरिक्त काहीही जर सीन मध्ये माहिती content असेल तर ती उत्कृष्ट स्क्रीन प्ले ला घातक आहे असे समजावे.

ह्या सीन मधून आपली किती आणि कशी पुढे सरकणार आहे ?
उदा - लगान सुरुवातीला येणाऱ्या प्रत्येक सीन मधून एकेक गोष्ट कळत  जाते की दुष्काळ पडलेला आहे …… दुगुनी लगान द्यावी लागणार आहे. इग्रज ऐकणार नाहीत अश्या प्रकारे परिस्थितीचे गांभीर्य seriousness वाढत जाते. हळूहळू एकेका सीन मधून आपण MDQ मोठ्या महत्वाच्या प्रश्ना कडे जातो. कधी कथेला वळण देणारा सीन येतो कधी उंची देणारा सीन येतो. ज्या सीन मध्ये कथा पुढे सरकत नाही तीच तीच माहिती एका character दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला सांगत असेल तर कथा तिथेच थांबलेली असते. प्रेक्षक खोळंबतो आणि कथेची पकड ढिली होते. कथा वेगवेगळ्या प्रकारे पुढे सरकवता येते. पहिल ध्येय हे असाव कि आपल्याला प्रेक्षकाना MDQ कडे न्यायचं आहे. एक एक पायरी ने आपल्याला महत्वाच्या मोठ्या प्रश्नाची ओळख करून द्यायची आहे. आपले सीन एका मागे एक असे यावेत कि हे ध्येय साध्य व्हायला हवे. कुठल्याही यशस्वी चित्रपटात हेच आढळून येईल. पण प्रत्येक फिल्म मेकर हे आपल्या वेगळ्या स्टाइल ने करीत असतो. कधी तो MDQ आधी सांगतो आणि मग स्पष्टीकरण देत जातो की हा सगळा काय प्रकार आहे. तर कधी तो हळू हळू MDQ कडे पायरी पायरीने नेतो. किंवा आणखी काही प्रयोग करतो.

दुसरी गोष्ट सीन मधून कळते ती व्यक्तिरेखे बद्दल ची माहिती. आपण character बद्दल काय माहिती देतो आहोत ? ती कहाणी शी किती संबंधित आहे ? आता लगान मधलाच एक सीन आहे वर वर पाहता तो तितकासा महत्वाचा वाटत नाही. भुवन ची एन्ट्री ……… रसेल हरिणांची शिकार करतो आहे आणि भुवन हरणांना सावध करतो. ह्या ठिकाणी भुवन ची भूतदया (sympathy for nature and animals) दिसते. तसेच तो पुढे काहीतरी क्रांती करणार आहे त्याची बंडखोरी सुद्धा दिसून येते. जी पुढे कथेमध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. अश्या प्रकारची चुणूक दाखवली तर सीन सार्थकी लागतो. पद्धती वेगवेगळ्या अनेक असू शकतील. पण परिणाम कारकता effectiveness टिकवला पाहिजे. सिनेमाच्या सुरुवातीला व्यक्तिरेखांची characters ची माहिती जास्त प्रमाणात द्यावी लागते. कधी कधी character खूप जास्त असतील तर निवेदन narration वापरून वेळ वाचवला जातो. काही वेळा आपली व्यक्तिरेखा काही काळानंतर आपले वेगळे रूप दाखवणार असते तशी कथेची गरज असू शकते. त्या वेळी योग्य ती खुबी वापरून आपले सीन लिहायला हवेत. म्हणजे जी माहिती आता सांगायची नाही ती सांगणारे सीन किंवा त्यातला काही भाग वगळावा.

april 17

कथेशी सीनचा संबंध (Relation to the Story)

  केवळ अमुक एका सिनेमात गाजलेला म्हणून  किंवा माझ्या सुपर स्टार ला आवडतो म्हणून  तश्या प्रकारचा तसा वाटणारा सीन टाकणे सृजनशील Creative लेखकाला कधीच रुचणार नाही. तो त्या सीन वरून आणखीन पुढचा विचार मांडून काहीतरी आगळा वेगळा सीन तयार करण्याचा Develop प्रयन्त करेल आणि प्रयन्त करेल तर यशस्वी देखील होईल. आणि तो त्याही पेक्षा जास्त प्रशंसा मिळवून जाईल. खरे पाहता शोर्ट कट हा फार नुकसान करणारा मार्ग आहे. तुमच्या प्रतिभा शक्तीचा अवमान तर हा करतोच पण तिला तो हळू हळू निकामी देखील करू शकतो. म्हणून कधी ही असे डुप्लिकेशन चे काम करू नये. थांबा वाट पहा ……… खूप वेळ वाट पहावी लागली तरी वाट पहा. काहीतरी नवीन सुचेल. पण जर तुम्ही तडजोड compramise केले कि मग तुमची प्रतिभा गप्प बसेल. पण जर तुम्ही अडून बसलात कि नाही हे होवून गेलेले आहे मला काहीतरी नवीन हवे आहे जे माझ्या कथेशी प्रामाणिक आहे.
तेच मला सांगितले पाहिजे. मला माझ्या कथेसाठी काम करायचे आहे. माझ्या कथेला पुढे नेणारा, कथेला परिणाम कारक करणारा सीन मला टाकला पाहिजे अन्यथा तो सीन लिहू नये किंवा वगळून टाकावा. पुन्हा पुन्हा वाचून सीनचा कथेशी संबंध दृढ आहे  की नाही तपासून पाहावे. हा सीन नसला तर काय होईल ? कोणते माहिती प्रेक्षकांना मिळणार नाही आणि त्याचा कहाणी समजण्यात काय समस्या येवू शकेल याचा तपशील पाहून त्या सीन ची योग्यता ठरवावी.

स्थळ (Location)

हा सीन कोणत्या ठिकाणी Location घडावा ? कोण कोणत्या ठिकाणी हा सीन घडू शकतो ? संभाव्य ठिकाणांची यादी करावी. प्रत्येक ठिकाणी तो कसा घडेल याची मनोमन उजळणी करावी. कुठे घडला तर तो जास्त परिणाम कारक वाटतो. तुम्हाला तो कुठे घडलेला भावतो ……. नोंद करावी. शंका वाटत असल्यास एखाद्या मित्राला मैत्रिणीला विचारावे की असे असे तुला करायचे असल्यास तू कुठे जाशील ? जसे प्रेमभंगाचा सीन असेल उंच बिल्डींग च्या टेरेस वर कि समुद्र किनारी  कि रेल्वे प्लट फार्म ? शोध घेणे महत्वाचे असते. बर्याचदा आपण आपणाला भावणारा निर्णय आपण पटकन घेतो. पण एक सदोदित लक्षात असू द्यावे सिनेमा हा आपल्या साठी नाही ………… कधीच नाही. तिथे आपल्या व्ययक्तिक आवडी निवडीला किंचितही जागा नाही आणि ती नसावी. Third Eye नेहमी वापरला पाहिजे. कि हे कसे दिसेल ? प्रेक्षकांना कसे दिसेल ? आवडेल कि नाही ? त्यांना ह्यात वेगलपणा दिसला पाहिजे आणि तो भावला पाहिजे. आणि location मधला वेगळे पणा शोधण तितकस कठीण नसत. भरपूर वेगवेगळी locations उपलब्ध असतात.

काळ (Time)

हा सीन कधी घडला पाहिजे काहीवेळा पेक्षा बर्याच वेळा काळ म्हणजे सकाळ कि सायंकाळ, दिवसा की रात्री ह्याची उत्तर सोपी असतात. जस ऑफिसला जाणार म्हणजे दिवसाच असेल पण काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण करता येवू शकते कि तो रात्री ऑफि मध्ये आहे. ह्या रात्रीच्या वेळी ऑफिस मध्ये असण्याने वेगळे नाट्य गवसते. का हा रात्री ऑफिस मध्ये आला असावा ? काहीतरी गफला करणार असेल ? काहीतरी झालेला गफला कसा झाला हे शोधत असेल ? अश्या प्रकारे बऱ्याच प्रकारचा वेगळे पणा  शकतो आणि आपल्या कथे मध्ये नाट्य पूर्ण प्रसंग आणता येतात. तसेच काहीवेळा हा सीन रात्री चा का किंवा दिवसच का इ. गोष्टींचा तपशील द्यावा लागतो आवश्यकता असेल तसा तो द्यावा. काळ आपल्या सीन मधील दृश्यात वेगळा रंग भरू शकत कारण काळा  नुरूप वेळेनुसार प्रकाश योजना बदलते आणि प्रकाश सिंचे स्वरूप आमुलाग्र बदलू शकतो.

सीन आणि व्यक्तिरेखा (Scene and Character)

आपल्या सीन मध्ये व्यक्तिरेखा कशी दाखवली गेली आहे ? ती तशी दाखवणे  योग्य आहे का ? काही प्रश्न विचारात घ्यावेत -------- विनिमय करावा. आपल्या character मूळ स्वभाव तसाच आहे की तो कुठे बदलला गेला आहे. जसे कि तो आई वर प्रेम करतो पण ह्या सीनमध्ये तो आई शी भांडतो ! का भांडतो ? त्या भांडणाचे कारण प्रेम असेल तरी चालेल किंवा त्या भांडणा मुळे प्रेमात वाढ होणार असेल ? किंवा आई मुला मध्ये दुरावा निर्माण करणे हि कथेची गरज असेल ? किंवा आणखीन काहीही योग्य कारण असेल ! पण ते कथेला पोषक नसेल तर तो सीन बदलणे आवश्यक होईल.
सीन व्यक्तिरेखा character ची ओळख करून देतो तेव्हा ती ओळख योग्य प्रकारे झाली आहे का ? महत्वाच्या character ची ओळख लक्षणीय व्हायला हवी असते. तसेच इतर characters ची ओळख लक्षात राहील अशी झाली पाहिजे.
एखादा सीन एखाद्या खूप लहान व्यक्तिरेखेचा होवून जातो तर तो खरोखर त्याचा होतो आहे का ? मागे नोकर आणि मालक असे उदाहरण दिलेले आहे. त्यावेळी त्या नोकराला न्याय दिला गेला पाहिजे. कारण नोकर पुन्हा स्क्रीन वर येणार नाही पण त्याच्या ह्या सीन मुळे मालकाच्या पुढील सीनचा परिणाम वाढणार आहे. अश्या प्रकारे सर्व सीन मिळून सिनेमा यशस्वी करणार असतात. त्या त्या सीन मध्ये त्या त्या व्यक्तिरेखांना न्याय मिळायला हवा असतो.
सीन च्या सुरुवातीला character मानसिक दृष्ट्या कुठे आहे. आणि सीन च्या शेवटी तो कुठे पोहोचला हा प्रवास योग्य आहे कि नाही ? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याचे उत्तर लेखक कडे असायला हवे. character चे संवाद dialogue समर्पक आहेत की नाही याची पडताळणी केली पाहिजे. शूटिंग च्या वेळी बरेच dialogue बदलतात पण ते तसेच्या तसे बोलले गेले पाहिजेत. सगळ्या व्यक्तिरेखा एकसारख्या वाटायला नकोत. त्याच्यात सौम्य तरी मतभेद असायला हवेत. दोन लोकांच देखील कधी सर्व बाबतीत एकमत आढळत नाही हे लक्षात ठेवाव.
प्रत्येक character च आपल स्वत:च ध्येय असत ते ह्या सीन मध्ये जपल गेल आहे का ?
MDQ चा संघर्ष वाढता आहे की नाही ?
नकारात्मक भूमिका संघर्ष वाढवत आहेत कि नाही ?
ह्या सीन ची सुरुवात मागील सीन च्या शेवताशी सुसंगत  आहे की नाही ?
ह्या सीन चा शेवट पुढील सीन च्या सुरुवातीशी जुळेल कि नाही ?
सीन मध्ये दृश्य visual भाग अपेक्षित परिणाम आणेल का ?
त्यातले आवाज sound कसे असतील ? ते परिणाम साधतील का ?
सीन मध्ये characters काही कृती  business द्यावी का जी सीन मधल्या content ला पूरक effective असेल.
मागील सीन आणि ह्या सीन मध्ये कथेचा किती काळ गेला आहे ? सहसा flash-back scene दाखवतांना हे जास्त महत्वाचे असते. तो कश्या प्रकारे लक्षात आणून दिला जातो आहे ?
ह्या सीन चा मूड serious comedy anger etc व्यवस्थित व्यक्त होतो आहे का ? हा मूड भाव सर्वात जास्त महत्वाचा कारण हा मूड प्रेक्षका मध्ये येणे आणि शेवटा पर्यंत टिकून रहाणे हेच चित्रपटाचे यश असते.

एप्रिल 18

अव्दितीय (Uniqueness )

"The structural unity of the parts is such that, if any one of them is displaced or removed, the whole will be disjointed and disturbed. For a thing whose presence or absence makes no visible difference is not an organic part of the whole." - Aristotle
कोणत्याही निसर्ग निर्मित वस्तू मधील एखादा भाग जर काढून टाकला किंवा जागा बदलून दुसरी कडे लावण्याचा प्रयन्त केला तर काय होईल ? समजा आपल्या शरीरा वरील हात काढून पायाच्या जागी लावला कान डोळ्याच्या जागी बसवण्याचा प्रयन्त केला तर सगळी गडबड होवून जाईल. वरील अरीस्टोटल चे विधान हेच सांगण्या चा प्रयन्त करते.  अव्दितीय एकजूट (unity) अशी असते कि त्यातून जर त्याचा एखादा भाग काढून टाकला किंवा त्याची जागा बदलली तर त्याच्या संपूर्ण अस्तित्वा मधेच गडबड होते. या विरुद्ध असेही म्हणता येईल की ज्या एका भागाच्या काढून टाकण्य मुळे किंवा एका भागाची जागा बदलण्या मुळे त्याच्या संपूर्ण अस्तित्वात काहीही फरक पडत नसेल तर तो भाग अद्वितीय भाग नाही . तो भाग तितका महत्वाचा नाही. निसंकोच पाने तो ताबडतोब काढून टाकावा.
एक उत्कृष्ट स्क्रीन प्ले चे ही तसेच आहे. एखादा सीन काढून टाकला तरीही त्या कथेच्या परिणामात काहीच फरक पडत नसेल तर तो सीन कुचकामी आहे तो तात्काळ काढून टाकावा. एखाद्या सीन ची जागा बदलली तरी त्याचा परिणाम बदलेल आणि जर बदलत नसेल तर तो सीन काहीही कामाचा नाही. सिनेमा ची कथा पुढे न नेणारे एखादे वाक्य सुद्धा लेखकाने खपवून घेवू नये. तरच तो सीन अद्वितीय बनू शकेल आणि अश्या अद्वितीय Unique सीन्स नि मिळून उत्कृष्ट स्क्रीन प्ले बनू शकेल.
हा Uniqueness सीन मध्ये आपल्या सिनेमा मध्ये आणणे खूप कठीण असते. Unique म्हणजे एकमेव अद्वितीय म्हणजे त्याच्या सारखा तोच, त्याच्या सारखा  दुसरा नाही. अनेक गोष्टींचा पाठ पुरावा करता करता कुठेतरी एक दोन गोष्टी अश्या सापडतात ज्या एकमेव असतात. अश्या गोष्टी सुचणे हि देखील आपल्या हातातली गोष्ट नाही. हुकमी रीतीने असे काही लिहिता येत नाही. ते खूप विरळ कधी तरी योगायोगाने सुचते.  ती ईश्वरी कृपा असते, कधी तरी आपल्या डोक्यात लकाकते आणि लेखकाला धन्य करून जाते. आपण पाठ पुरावा करीत राहणे एवढेच आपल्या हाती असते.

पुढील भाग पासून आपण characterisation व्यक्तीरेखा कशी परिपूर्ण घडवावी ह्या विषयी च्या अभ्यासाला सुरुवात करू. माझ्या ह्या लिखाणा चा कोण कोण उपयोग करीत आहे ? जे जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपया वाचकांनी मला माझ्या ई-मेल आयडी वर मेल करावेत आणि आपली ओळख वाढवावी  हि विनंती.

एप्रिल 19  

शनिवार, ३० मार्च, २०१३


कथेची तीन भागात विभागणी
(Division of the Story in to Three Acts )
चित्रपटाच्या लिखाणाला प्रत्यक्ष सुरुवात करण्या आधी आपण कथेचे तीन भाग करावेत असा सर्व साधारण नियम आहे. काही लेखक लिहिण्या साठी आपल्या कथेची पांच किंवा सात भागात विभागणी करतात. पण आपण तीन भाग करण्याच्या मार्गाने विचार करू. तसा कोणत्याही पद्धतीने मोठा काही फरक पडत नाही. कारण हा आपापल्या सोयीचा भाग असतो. लेखक आपल्या कथा विचारांची मांडणी कशी करतो यावर ते अवलंबून असते. त्यामुळे दर्शकांच्या अनुभूतीला काहीही फरक पडत नाही.
कथेची विभागणी करायची याचा अर्थ असा नाही की कथेचे तुकडे करायचे असतात. कथा सर्वथा सलग आणि प्रवाही असायला हवी असते. हे भाग लिहिण्याच्या सोयी करिता करायचे पण ते वाटायला नकोत.

चित्रपट कसा तयार होतो ? -

कथा एक सलग गोष्ट असते.
पटकथा म्हणजे - वेगवेगळ्या लोकेशन नुसार आणि वेळेनुसार त्या कथेचे काही सीन होतात.
संवाद - प्रत्यक व्यक्तीरेखाचे आपापले  ध्येय संघर्ष ह्यातून त्याचे बोलणे लिहिले जाते.
पटकथा संवाद लिहून झाल्यावर दिग्दर्शक ह्या लिहिलेल्या स्क्रिप्ट चे ब्रेक डाऊन करतो.
प्रत्येक सीन मध्ये तो काही वेगवेगळ्या अन्गल ने शॉट स घेतो. (एक्शन आणि कट ह्यामधला भाग)
lab मध्ये हे सगळे शॉट बरोबर एकसंध सलग वाटतील असे जोडले जातात.
आणि शब्दातली कथा चित्र स्वरुपात अखंड होते.


याच प्रकारे आपण आपल्या कथेचे तीन काल्पनिक भाग करायचे.

पहिल्या भागात प्रेक्षकांना व्यक्तिरेखांच्या आणि कथेच्या विश्वात सामावून घायचे असते.

दुसऱ्या भागात नायकाला जे हवे आहे ते मिळवण्यातला संघर्ष चढाओढ रंगवायची असते.

तिसऱ्या भागात हा संघर्ष अत्युच्च टोकाला नेवून समाधाकारक शेवटाला  न्यायचे असते.

ह्यामध्ये कुठेही पडदा पडत नाही, क्लिअर कट वेगवेगळे अंक होत नाहीत. सिनेमा स्टार्ट टू एन्ड अखंड स्वप्ना सारखा असतो. ह्या स्वप्न तून तो इच्छा असूनही बाहेर पडत नाही. पडू इच्छित नाही तेव्हा सिनेमा यशस्वी होतो. तुम्ही खूप उत्कृष्ट सिनेमा पाहून उठता तेव्हाचे स्वत:चे भान तपासून पहा, किंवा उत्कृष्ट सिनेमा पाहून थिएटरच्या बाहेर आलेल्या प्रेक्षकांचे चेहरे न्याहाळा. तुम्हाला ते स्वप्नातून उठून आल्या सारखेच वाटतील. जाग  आली एक मोठा सुस्कारा सोडतांना दिसतील. प्रेक्षकांना तुम्ही केलेल्या तीन भागाची किंवा शॉटची जाणीव होत नाही. ही तीन भागांची सोय लेखनासाठी केलेली असते. ह्यासाठी की आपल्या कथेचा कमी आवश्यक भाग जास्त दीर्घ होवू नये. आणि अत्यंत आवश्यक भाग लहान राहू नये.

आपण कश्या बद्दल ची गोष्ट सांगणार आहोत ? आपल्या प्रमुख व्यक्तिरेखा कोणकोणत्या आहेत ? हि कथा कुठे घडते आहे ? हे सांगण्यासाठी आपण खूप वेळ घातला तर महत्वाचा संघर्ष दाखवायला वेळ काम पडेल. ही गल्लत टाळण्या साठी हे करावयाचे आहे.

तीन भागात विभागणी करणे हा काही पक्का ठरलेला फार्मुला नाहीये. कि कोणतीही कथा ह्या साच्यात टाकता येईल. लक्षात घ्या हे सृजनशील काम आहे. येथे ठरलेले फार्मुले  व्यर्थ ठरतात.

हे भाग साधारण किती लांबीचे असावेत ह्याबद्दल ही पक्का नाही पण एक नियम आहे- संपूर्ण चित्रपटाची लांबी (किंवा संहितेची) जितकी आहे त्याचे चार भाग करावे. समजा फिल्म दोन तासांची आहे (1२० मिनिटे ) तर पहिला  एक चतुर्थाश भाग (तीस मिनिटे )हा फर्स्ट अक्ट असावा. पुढील दोन भागांचा (साधारणत: निम्मा) (साठ मिनिटे)सेकंड अक्ट असावा. उरलेला शेवटचा चतुर्थाश भाग (तीस मिनिटे)थर्ड अक्ट असावा. लिखित संहिता १०० पानांची असेल तर


------------- २५% ------------! -------------------- ५० % ----------------------- ! ----------- २५ % ------------ !

            फर्स्ट अक्ट                                      सेकंड अक्ट                                         थर्ड अक्ट

             ३० मिनिटे                                        ६० मिनिटे                                         ३० मिनिटे
              २५ पाने                                            ५० पाने                                             २५ पाने
            

हे तुमच्या कथे प्रमाणे थोडे पुढे मागे होवू शकते. काही अपरिहार्य ठिकाणी सर्वथा वेगळेही असू शकते. पण असा सर्व साधारण नियम हॉलीवूड च्या स्क्रिप्ट रायटर नी घालून घेतला आहे. आपल्या कडे ह्याचा तितकासा वापर होत असावा असे वाटत नाही. पण काही उत्कृष्ट चित्रपटांची रचना तशी झालेली आढळते. त्यामुळे ही पद्धत उपयोगी वाटते.
हे तिन्ही भाग (अक्ट ) कसे असावेत कसे करावेत ह्या बद्दल चर्चा करण्या साठी आपण लगान ह्या सिनेमाच उदाहरण डोळ्या समोर ठेवू या.                                                                                          मार्च ३1



सुरुवात (ACT ONE)

प्रथम आपणास आपल्या कथेची पार्श्वभूमी उभी करायची असते. आता “लगान” ह्या चित्रपटाचा आपण संदर्भ घ्यावयाचा ठरवले आहे. “लगान” सिनेमाची लांबी २२०  मिनिटे अशी आहे. ह्याचे आपण चार समान भाग केले तर प्रत्येक भाग ५५ मिनिटांचा होईल. वर पहिल्या प्रमाणे पहिला भाग एक चतुर्थाशं  म्हणजे ५५ मिनिटांचा होतो. “लगान” च्या पहिल्या ५५ मिनिटांचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल कि पहिला भाग कसा असावा. लक्षात घ्या एक्झ्याक्टली ५५ व्या  मिनिटाला हे झालच पाहिजे अस नाही. सिनेमा बनवणे हे  क्रियेटीव्ह  काम आहे. त्यात १०० % असच पाहिजे असा नियम असूच शकत नाही. तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र आहे. पण असे असले तर ते जास्त  परिणाम कारक होवू शकते.
तर “लगान” सुरु होतो. टायटल संपताच तिसऱ्या मिनिटाला अमिताभ बच्चन यांचा धीरगंभीर आवाज आपणास स्वातंत्र पूर्वीच्या काळात घेवून जातो. चंपानेर गावाची सैर होते, लगान हा काय प्रकार असतो हे समजते. आणि हि लगान देण्याची ह्या लोकांची परिस्थिती नाही हे कळते. साधारण १३ मिनिटाला भुवन ह्या नायकाची मनोभूमिका प्रेक्षकांना कळते. तो शिकार होण्या पासून हरिणांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. ह्यातून भुवनच्या मनातली  भूतदया दिसते आणि तो इंग्रजांच्या विरुद्ध आहे हे समजते. ह्या ठिकाणी भुवन वाचतो. पण ह्याच मुळे तो सर्व गावाला धोक्यात आणतो. साधारण २० व्या मिनिटाला राजा पुरण सिंघ मांसाहार घेत नाही म्हणून मागील वर्षाचे कारण दाखवून लगान दुप्पट करतो.
हे ऐकून ३९ व्या मिनिटाला सर्व गावकरी राजा पुरण सिंघला लगान माफीच साकड घालायला येतात. तेव्हा कॅप्टन रसेल विक्षिप्त पणे लगान माफ करतो आणि अट टाकतो ती हि भुवनला. कॅप्टन रसेलला भुवन च्या डोळ्यात दिसणारी बंडखोरी विझवायची असते. कॅप्टन रसेलच्या विक्षिप्त पणाचा ह्या ठिकाणी खूप छान वापर केला आहे प्रसंगात नाट्यमयता आणण्या साठी. आणि हा चित्रपटाचा महत्वाचा सीन होतो. येथून कथेला वळण प्राप्त होते. भुवन ने क्रिकेट खेळण्याच चलेंज स्वीकाराव कि नाही ? हा प्रश्न सिनेमातल्या व्यक्तिरेखा सोबतच प्रेक्षकांना ही भंडावतो. गावकऱ्यांच कुजबुजत भुवनला गप्प राहायला सांगण आणि बाकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आलेलं दडपण. प्रसंगाचं गांभीर्य वाढवत. कॅप्टन रसेल जिंकण्याची रक्कम वाढवत जातो. तीन वर्षाची लगान माफ ……………… भुवन पूर्ण आत्मविश्वासान कबूल करतो. गावकर्यांची त्रेधा. राजाला विनवण. क्रिकेट खेळण्याचा भुवन चा लुटुपुटू चा प्रयत्न. शेजारच्या गावावाल्यांचा राग. पुन्हा राजा पुरणसिंग ची विनवणी पण आता गोष्ट पूर्णत: हात बाहेर गेलेली. ५७ व्या मिनिटाला राजा सांगतो “उनका खेल सिखो !”
आता क्रिकेट खेळण्या शिवाय मार्ग नाही.
हा ३९ व्या मिनिटा पासून ५७ व्या मिनिटा पर्यंत जो चालतो तो पहिल्या भागाचा अत्युच्च बिंदू ! इंग्रज विरुद्ध गावकरी अशी क्रिकेट match होणार कि नाही हा संघर्ष येथे संपतो. आता match होणारच आणि ती कशी होणार ? भुवनला कोण कोण खेळाडू मिळणार ? मिळतील की नाही ? ते हा खेळ कसा शिकतील ? कोण शिकवेल ? आणि मग ते जिकंतिल की हारतील ? असे बरेच प्रश्न प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे प्रेक्षकांना पडतात. थोडक्यात काय होईल ह्याची उत्कंठा लागते. आणि त्याच्या पाठीचा कणा ताठ होतो. ते सरसावतात.
नेमके हेच काम पहिल्या act मध्ये करावयाचे असते. आपल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच एकमेकांशी असलेल नात, संबंध, प्रत्येकाची ओळख, नायकाला काय मिळवायचं आहे ? त्याला येवू शकणाऱ्या अडचणी ? हे समजावून  सांगत जातो. आणि ह्या पहिल्या भागाच्या शेवटी महत्वाचा  मोठा  प्रश्न निर्माण करतो.  Major Dramatic Question
महत्वाचा  मोठा  प्रश्न
आपल्या सिनेमा साठी किती महत्वाचा आहे हे आपण उद्या
पाहु. April 01


महत्वाचा  नाट्यपूर्ण  प्रश्न (major Dramatic Question)

कुठल्याही उत्कृष्ट सिनेमात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी एकमेव शक्ती असते. ह्या शक्तीनेच चित्रपटातल्या साऱ्या घटना कार्यान्वित होत असतात. एखाद्या चक्री वादळा सारख ती शक्ती प्रेक्षकांना झपाटून टाकते.
ती शक्ती म्हणजे सिनेमाचा सुपरस्टार नसते !
ती शक्ती त्यात केलेल्या तांत्रिक इफेक्टची नसते !
त्यातल्या उत्कृष्ट एक्शन सीनची नसते !
दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या एखाद्या डायालोग ची हि नसते !
ती शक्ती असते एका प्रश्न चिन्हाची, वरील सर्व घटकांनी मिळून  प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या major Dramatic Question ची ! major Dramatic Question (MDQ). महत्वाचा नाट्यपूर्ण  प्रश्न !
लगान मध्ये घडणारा ३९ व्या मिनिटा पासून ५७ व्या मिनिटा पर्यंतचा सिक्वेन्स हा प्रेक्षका समोर एक मोठा प्रश्न निर्माण करतो. भुवन क्रिकेट खेळण्याच हे धैर्य करेल का ? ह्या प्रश्नाच उत्तर ह्या भागाचा अत्युच्च बिंदू ठरतो.
प्रेक्षकांच्या मनातही एक घालमेल सुरु झालेली असते. भुवन ने हे साहस करावे का ? तो ह्या इग्रजांच्या विरुद्ध क्रिकेट खेळू शकेल ? जिंकू शकेल ? आणि प्रेक्षकांना उत्तर मिळते. हे उत्तर MDQ निर्माण करते.
भुवन आता क्रिकेट खेळणार, आणि दुसरा महत्वाचा मोठा नाट्यपूर्ण  प्रश्न समोर येतो. भुवन हि match जिंकेल का ? तीन वर्षाची लगान माफ होईल का ? ह्या प्रश्नाच उत्तर हाच चित्रपटाचा शेवट आहे ! ह्या प्रश्नासाठी हा संपूर्ण चित्रपट चालणार आहे. ह्या प्रश्ना मुळेच प्रेक्षका मध्ये चित्रपट विषयी समरसता आलेली आहे. प्रेक्षकांना भुवन आपलासा वाटायला लागला आहे. प्रेक्षक भुवन मध्ये स्वत:ला पाहायला लागले आहेत. भुवनच्या जिंकण्याने प्रेक्षकांना जिंकल्याच समाधान मिळणार आहे. आणि ह्या त्याच्या समरसते मुळेच त्यांना पुढचे अनेक प्रश्न सतावू लागतात.
आता match  कशी होणार ? भुवनला कोण कोण खेळाडू मिळणार ? मिळतील की नाही ? ते हा खेळ कसा शिकतील ? कोण शिकवेल ? आणि मग ते जिकंतिल की हारतील ? असे बरेच प्रश्न प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पणे प्रेक्षकांना पडतात. थोडक्यात काय होईल ह्याची उत्कंठा लागते. तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक सिनेमात,  गोष्टीत तुम्हाला हा महत्वाचा मोठा प्रश्न दिसून येईल.
गब्बरसिंग मरेल कि नाही ? ……………… शोले !
प्रेमला निशा मिळेल का ? ……………….   हम आपके है कौन ?
विद्या बागची ला तिचा पती सापडेल का ?     कहानी
हा प्रश्न उत्तर शोधण्यास जितका कठीण ? तितका सिनेमा दर्शकांना जास्त गुंतवून ठेवू शकेल. ह्या MDQ च उत्तर जितक जास्त नकारात्मक तितकी उत्कंठा जास्त आणि शेवटी हे उत्तर कसे होकारात्मक होईल तितका सिनेमा जास्त रंजक होतो. ह्या MDQ चा अशक्या कडून शक्य होण्या कडे जो प्रवास असतो तो म्हणजे act २ !                                       एप्रिल ०2



पहिला झटका (Plot Point One)

ज्याठिकाणी MDQ निर्माण होवू लागतो. पहिला झटका प्रेक्षकांना बसतो. त्या ठराविक दृश्याला किंवा सीनला प्लॉट पोइंट असे म्हणतात. आपल्या लगान मध्ये ३९ व्या मिनिटाला कॅप्टन रसेल भुवनला उभा करतो आणि क्रिकेट खेळण्याच चालेंज देतो. तिथे संघर्षाची पहिली ठिणगी पडते. पहिला झटका प्रेक्षकांना बसतो. याला आपण Plot Point One असे म्हणावे. हा Plot Point कुठे असावा ह्या संबधी एक नियम आहे. पहिल्या भागाच्या Act One च्या शेवटी हा असायला हवा. असा अगदी पक्का नाही पण नियम आहे. सिनेमा सुरु झाल्या पासून २५ ते ३० मिनिटात हा Plot Point यायला हवा. कधी कधी तो अगदी पहिल्या पाच मिनिटात हि येवू शकतो. किंबहुना आणला जातो. काही रहस्यमय चित्रपटात सुरुवातीलाच कुणाचा तरी त्या हवेलीत मर्डर होतो. म्हणजे आपला नायक येथे येवून फसणार आहे याची चाहूल आपणाला मिळते.


------------- २५% -----!--P P -----! -------------------- ५० % ------------------- ! ----------- २५ % ------------ !

            फर्स्ट अक्ट                                      सेकंड अक्ट                                         थर्ड अक्ट

             ३० मिनिटे                                        ६० मिनिटे                                         ३० मिनिटे

              २५ पाने                                            ५० पाने                                             २५ पाने


PP म्हणजे Plot Point One ची जागा हि अशी  असावी. तोपर्यंत च्या भागात काय कथा आपण सांगणार आहोत ? आपला नायक कोण ? नायिका कोण ? आणि खलनायक कोण ? कसा ? इ. माहिती आणि स्वरूप आपणास व्यक्त करावयास हवे. आपल्या नायकाचे ध्येय काय आहे हे दाखवले आणि आता संभाव्य अडचणी ची झलक म्हणजे Plot Point One असतो. ह्या point मुळेच दर्शकांचा सिनेमात interest वाढतो.

हा झटका किती वेगळ्या प्रकारे देत येवू शकतो ह्या वर आपण खूप विचार पूर्वक निर्णय घ्यायला हवा. आपल्या कथेचे वेगळेपण येथूनच सुरु होते.
कहानी ह्या सिनेमाचे उदाहरण घेतले तर लक्षात येईल कि विद्या बागची आपल्या पतीचा शोध घेते आहे पण तिच्या माहिती प्रमाणे तो ज्या ऑफिसात काम करतो तिथे त्याची नोंदच नाही. आणि त्याच्या सारखाच दिसणारा मिलन दामजी तिथे काम करत होता. अशी विचित्र माहिती मिळते. हा काय काय गोंधळ असावा ह्या प्रश्नाने प्रेक्षक कथेत गुंतून जातो. Major Dramatic Question च्या उत्तराच्या शोधणे पझाडतो. आणि सिनेमा सक्सेस होतो.                                                                                                एप्रिल ०३

संघर्ष मय मध्य (ACT TWO )

पहिल्या भागातून कथेचा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा परिचय झाला. नायकाचे ध्येय प्रेक्षकांना कळले, त्यात येणाऱ्या अडचणींची सुरुवात झाली, किंवा अंदाज आला कि कश्या प्रकारचा  संघर्ष समोर येणार आहे. ह्या  संघर्षाची झलक दिसली (Plot point one). नायक कश्यासाठी जीवापाड प्रयन्त करणार आहे (MDQ) हे हि समजले. आता ते तो कसे मिळवेल ? खलनायक त्याला रोखण्यासाठी काय करेल ? त्यावेळी नायकाला कोण कोण मदत करेल ? कोण कोण विरोध करेल बराचसा अंधुक अंदाज प्रेक्षकांना आलेला आहे.
कदाचित तुम्ही निर्माण केलेला MDQ प्रेक्षकांना भावलेला आहे. पण जर त्यांनी (प्रेक्षकांनी) बांधलेल्या अंदाजा प्रमाणेच पुढील गोष्टी घडत गेल्या तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे त्यांना मजा येणार नाही. त्यांच्या अंदाजाला चुकवणार अनपेक्षित अस संकट नायकाच्या मार्गात यायला हव असत. ह्यातून निघण्याचा मार्ग नायकाला मिळणार नाही अस प्रेक्षकांना वाटल पाहिजे. तेव्हाच नायकाची खरी कसोटी लागते. आता नायक व्यक्तिरेखा हे करील कि ते करील ? त्याने असे असे करावे म्हणजे असे होईल किंवा तसे होईल ह्या चक्रात प्रेक्षक अडकतो. खर्या अर्थाने हे संकट प्रेक्षक स्वत:वर ओढून घेतो. आणि आपला नायक खुबीने त्या संकटावर मात करतो तेव्हा प्रेक्षक सुटकेचा निश्वास सोडतो. नायक जेव्हा त्या दु:खाने कळवळतो तेव्हा प्रेक्षकही व्यथित होतो. नायक हार मानु  लागतो तेव्हा प्रेक्षक शरमिंदा होतो. तो स्वत:ला त्या कथेचा भाग समजतो. नायकाचे मित्र किंवा प्रेयसी नायकाला उमेद देतात तेव्हा प्रेक्षक सुखावतो. आणि नायक आपल्या संघर्षाला पुन्हा सुरुवात करतो. आपले ध्येय मिळवतो किंवा हारतो.
वेगवेगळ्या कथे नुसार असाच अनुभव प्रेक्षक उत्कृष्ट सिनेमा मधून घेत असतात. त्यातल्या दु:खाची तीव्रता कमी जास्त असेल ! त्यातल्या साहसाची मर्यादा कमी जास्त असेल ! प्रत्येक कथे नुसार तो अनुभव काहीसा वेगळा तरीही सारखाच  असेल.
ह्या संघर्ष मय मध्य असलेल्या भागाचे (Act Two)  लिखाण जरा जास्त कठीण असते. नवख्या लेखका मध्ये बर्याचदा लिखाणाची घाई होते, कुठल्यातरी आवडलेल्या चित्रपटा तील दृश्याशी मिळती जुळती दृश्ये लिहिली जातात. वेगळेपणा राखण्यात लेखक अपयशी होतो. वस्तुत: हे अपयश त्याने स्वत:च स्वीकारलेले असते. कारण जो पर्यंत आपणास नाविन्य सापडत नाही तो पर्यंत विचार करवा  …… आपल्या नायकाला तसेच अडकलेले राहू द्यावे. कधी कधी रात्रंदिवस तो तसाच राहू द्यावा. आपण त्याला मदत देण्यासाठी प्रयन्त करावा (कथेतील इतर व्यक्तिरेखा च्या कडून ) आणि आपल्या आतूनच त्याचा मदत घेतोस का म्हणून विचारावे. घेतलीस तर तुला काय फायदे होतील ? काय नुकसान होईल ह्याचा परामर्श करावा. ह्या खोळंब्यातून आपल्याला एखादा अदभुत मार्ग सापडतो. आणि लेखकाला स्वत:लाही अचंबा वाटतो, आणि आपण थांबलो , वाट पाहिली ह्याच समाधान वाटत.
लगान सारखी फिल्म लिहितांना आशुतोष गोवारीकरांना असच बर्याचदा खोळंबून रहाव लागल असणार. भुवनला संकटात कसा टाकायचा ह्यावर मेहनत करायची आणि मग आता कसा सोडवायचा ह्यावर विचार करकरून स्वत:ला  पछाडायच ! काही लोक बुद्धिबळ दोन्ही कडून स्वत:च खेळतात तस.
हा दुसरा अक्ट लिहायला लेखकाचा अतोनात जीव घेणारा असतो. हा सिनेमाचा महत्वाचा आणि सर्वात मोठा भाग असतो. लगानच्या अनुषंगाने आपण ह्याचा अभ्यास करू !                                   


------------- २५% ------------! -------------------- ५० % ----------------------- ! ----------- २५ % ------------ !
            फर्स्ट अक्ट                                      सेकंड अक्ट                                       थर्ड अक्ट
             ३० मिनिटे                                        ६० मिनिटे                                      ३० मिनिटे
              २५ पाने                                            ५० पाने                                             २५ पाने
            
 एप्रिल ०6


लगान चा संघर्ष मय मध्य (ACT TWO with LAGAAN )

भुवन चैलेंज स्वीकारतो पण गाववाले त्याला विरोध करताहेत, तरीही भुवन बल्ला बनवून आणतो छोट्या मुला सोबत खेळतो मादिरातला मुका बाघा येवून मिळतो. लुटुपुटू च खेळण सुरु होत. दाढीवाला भविष्य सांगणारा वेडा  गुरण खेळू लागतो. हे सार पोरकट वाटणार, अस करून भुवन इंग्रजांशी कसा जिंकू शकेल ? सर्वांच्या टिंगल टवाळी चा विषय होतो.
शेजारील गाववाले भवनला शोधत येतात. मारण्या साठी कि ह्याच्यामुळे आपणा सर्वांवर केवढी आपत्ती आली आहे. सरपंच  भुवनला वाचवतो आणि त्याला मारून मुटकून राजा पुरणसिंग कडे माफी मागण्या साठी नेतात. पण राजाच्या हातातून गोष्ट नुघून गेलेली असते. रसेल आपले काहीही ऐकणार नाही हे राजा ओळखून असतो. आणि तो सर्व गावकर्यांना सुनावतो कि आता तुम्हाला हे भोगाव लागणार आहे. आता तुम्ही ह्या गोऱ्या लोकांचा खेळ शिका ! आणि गावकऱ्यांवर ह्या आपत्तीचा सामना करण्या शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. भुवनला मदत करण्या शिवाय आता हातात काहीही नाही. तरीही गावकरी एकमताने एकजुटीने भुवन सोबत येत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागाची दमदार सुरुवात होते.
MDQ महत्वाचा नाट्यपूर्ण प्रश्न निर्माण झाला. Plot Point One पहिला झटका बसला. ह्या लहान मुलाच्या आणि बाघा व गुरण च्या सहाय्याने टीम जमणार नाही. कशी जमेल टीम ? हा पहिला प्रश्न निर्माण होतो.
दुसरा भाग लिहितांना हे असाच होत एक प्रश्न निर्माण होतो त्याच काहीस उत्तर मिळत तोच दुसरा प्रश्न, काहीतरी दुसरी समस्या समोर येते. तो काही प्रमाणात सुटतो न सुटतो तोच पुढचा प्रश्न आ वासून उभा राहतो.
प्रश्नौत्तारांची हि साखळी अखंड उंचावत जायला हवी कथेच्या सर्वोच्च बिंदू कडे !
तर भुवनला चांगली टीम बनवायची हा निकटचा पहिला प्रश्न - भुवन हेरतो गोळी ह्या व्यक्तीला. तो गोफण फिरवतो बोलिंग हा तसलाच प्रकार आहे. भुवन त्याच्याशी सहजतेने बोलतो कि “ तू काय बाबा शेताचा एक तुकडा विकून लगान देवू शकतो “ ह्या प्रश्नाने गोळी थरारून उठतो. जीव कि प्राण असलेल शेत मी विकणार ? नाही म्हणताच मग लगान कशी देणार ? गोळी समोर खेळात सहभागी होण्या शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. भुवनला एक चांगला खेळाडू मिळतो. इथे नायकच कौशल्य दिसून येत. लीडरशिप दिसते. प्रत्येकाला पटवताना भुवन कसा वेगवेगळ्या प्रकारे वागतो. गोळीला पटवताना त्याचा मनातली भीती वापरतो तर कोंबड्या वरून सदानकदा भांडणारा भुरा प्रशंसेच्या बळावर पटवतो. इसरकाका ला भावनेच्या आधारे पटवतो.
आता इकडे भुवनची टीम जमू लागते आहे, प्रेक्षकांना जरा  निवांत वाटू लागते तोच कॅप्टन रसेलला त्याचे सिनिअर झापतात त्याच्या  चुकीच्या निर्णयाची सजा काय असेल ह्याची जाणीव करून देतात त्यातून प्रेक्षका  वरचे दडपण वाढते कि आता कॅप्टन रसेल काहीतरी असे करील की भुवन ला अडचणीत आणेल.
पण होते वेगळेच कॅप्टन रसेलच्या चिडचिडी मुले अर्जुन घोड्याला नाल ठोकणारा अपमानित होतो आणि भुवनला येवून मिळतो.
एलिझाबेथ कॅप्टन रसेलची बहिण भुवनला मदत करते क्रिकेट शिकण्या साठी. ह्यामुळे कथेला दुहेरी फायदा होतो. कथेत गौरी ह्या व्यक्तिरेखेला कंगोरे मिळतात. कथेत रोमांटिक किनार मिळते.
ह्या एलिझाबेथ चा लेखकाने खूप छान वापर केला आहे. हि इंग्लिश बाई भुवनला मदत करते आहे हे पाहून ईस्माईल हा व्यवसायाने सुतार असलेला चांगला खेळाडू भुवनला मिळतो.
आता भुवन बराच सशक्त झालेला आहे. टीम जमत आलेली आहे. भिवान टीम कशी जमवेल ह्या प्रश्नाचे उत्तर जवळ जवळ मिळालेले आहे- तोच एक घटना घडते.
गौरीच्या प्रेमाने दुखावलेला लाखा कॅप्टन रसेलला जावून मिळतो आणि फितूर खेळाडू बनून भुवनच्या टीम मध्ये सामील होतो. ही घटना भुवनच्या टीमला कमजोर करते. ६० व्या मिनिटा पासून भुवन ची टीम बनू लागली आहे आणि १०० व्या मिनिटाला ती बनत आलेली लाखाच्या मुले खिळखिळी होते. हा कधी भुवनला दगा देईल हा प्रश्न अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतो.
पंजाब मधून भुवनला शोधत आलेला देवा हा सरदार. पुढे  कचरा च्या मुले निर्माण झालेला वाद कथेला जातीय स्वरूप देतो पण एक मोठा संदेश देत तो वाद मिटतो. आणि ११ जणांची टीम पूर्ण होते.
एलिझाबेथ ची मदत लाखामुळे कमी होते. तरीही भुवन कॅप्टन रसेलला टक्कर देण्याच्या तयारीत येतो. आणि सामना सुरु होतो.
कॅप्टन रसेल बल्लेबाझी घेतो. काचाराची बोलिंग स्पिन होत नाही, तो खूप रन देतो. चिंता वाढते.
गोळी गोफण फिरवल्या सारखी बोलिंग टाकून काही काळ घाबरवतो पण त्याचे टायमिंग सापडताच तो ही फेल होतो. टेन्शन वाढू लागते आणि लाखा ची फितुरी पकडली जाते. सारे लाखाला खायला उठतात. पण भुवन च्या व्यक्तीरेखेला एक वेगळी किनार येथे लाभते. भुवनही लाखाला खूप मारतो असे दाखवता आले असते. पण नाही भुवन ह्याही परीस्थित आपल्या ध्येयाला पक्का चिकटलेला आहे. तो ह्याही परिस्थितीत match कशी जिंकता येईल ह्याचाच विचार करत असतो . तो सर्वांना थोपवून एकटा लाखाशी बोलतो. लाखाला गावातच राहावे लागणार आहे. तो आपल्याशी गद्दारी करू शकेल पण गावाशी नाही. हा मुद्दा पकडून भुवन त्याचा कौशल्याने उपयोग करून घेतो आणि समस्येला संधी मध्ये परिवर्तित करतो. अश्या घटनामुळे प्रेक्षक आश्चर्य युक्त आनंद अनुभवतात. नायकाच्या कौशल्यावर खुश होतात. कथेत भावनिक दृष्ट्या गुंततात.
कचराच बॉल स्पिन होतो तो तीन विकेट घेतो. आश्चर्य युक्त आनंद.
अनेकदा कॅच सोडणारा बाघा अचानक कॅच घेतो आश्चर्य युक्त आनंद.
अनेक प्रश्नाची चढाओढ चालत रसेलची इनिंग संपते आणि एक मोठा प्रश्न समोर येतो २२३ रन कसे होतील ?
१६७ व्या मिनिटाला ह्या प्रश्नावर भुवनचि इनिंग सुरु होते. देवा आणि भुवन दमदार सुरुवात करतात. ७१ वर देवा आऊट होतो. ईस्माईल जखमी होतो. अर्जुन बाघा लाखा असेच आउट होतात. खरे बल्लेबाझी करणारे आउट आणि जखमी ……… एकटा  भुवन बोलर च्या सहाय्याने एवढे रन काढू शकणार नाही . हे जवळ जवळ निश्चित स्पष्ट दिसते आहे. आता हार नक्की, आता तीन वर्षाची लगान कशी भरणार ? सगळा अंधार ------ उत्तर नाहीच ! संपूर्ण निराशा देत दुसरा भाग संपतो. दुसऱ्या भागाचा हा अत्युच्च बिंदू ठरतो. कारण भुवन क्रिकेट match जिंकणार कि हरणार हा MDQ आहे. उत्तर नकाराम्तक येतंय म्हणजे दिसतंय आशा राहिलेली नाही.
हे उत्तर अपेक्षित नाही मान्य होणार नाही. आणि खरे म्हणजे अजून निकाल लागलेला नाहीये. काहीतरी होणार नक्की काय होणार ते कळत नसल तरी ते पाहण्याची उत्कंठता दाटून येते. संघार्षाची पराकाष्टा हा अनुभव देन हेच  दुसऱ्या भागाच उदिष्ट असत.


चित्रपट लिखाण साठी आपण कथेचे तीन भाग केले ह्यातला दुसरा भाग जो सर्वात मोठा आणि संघर्षाने भरलेला असावा. तो तसा करण्यासाठी काही साधन आपल्या हाती असतात त्यांच्या आपण परिचय करून घेवू. हि साधन आहेत हि वापरलीच पाहिजेत असा आग्रह धरता येत नाही. आपल्या कथेच्या गरजे नुसार कमी अधिक प्रमाणात आपण त्यांचा वापर करावा अथवा करू नये.

१) अडथळे (Obstacles) -


    दुसरा संपूर्ण भाग हा अडथळा शर्यतीचाच असतो. एकेक अडथळे पार करत नायक आपल्या उद्दिष्टा कडे सरकतो. वरील लगान चित्रपटा अभ्यास केला तर ते आढळून येईल. आपली कथा दमदार आणि अफलातून करण्या साठी खूप संकटांचा बदिमार करू नये. त्यात समर्पकता असायला हवी. हे संकट येवू शकत हे पातळ पाहिजे किंबहुना लेखकाने दिग्दर्शकाने ते पटवल पाहिजे. समोर आलेलं संकट ही आश्चर्याचा धक्का देत आणि त्यावर नायकाची मात प्रेक्षकांना सुखावते.


हि सगळी योजना कौशल्याने केली पाहिजे.




२) पहिला प्रयत्न (First attempt) -
    Plot Point One ला नायकाची जी प्रतिक्रिया असते, समोर आलेल्या संकटाचा जो पहिला सामना होतो तो दिलखेचक असायला हवा. बहुदा नायक ह्या पहिल्या संघर्षात हरतो, कमी पडतो. पण त्यातूनच पुढील सामना रंगतदार होणार याची झलक मिळते. हा पहिला प्रयन्त बर्याचदा साधा सरळ असतो. आपल्या कथेच्या अनुषंगाने ह्या प्रकारात नाविन्य आणले पाहिजे.



३) निर्दय पणा ( merciless)

   आपल्या कथेतील व्यक्तिरेखांशी आपण दया दाखवणे कथेच्या दृष्टीने फायद्याचे नसते आपण निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांचा स्वभाव व्यक्त करण्या साठी आपल्या जवळ दोन च मार्ग असतात. एक कुणीतरी त्यांच्या स्वभावा बद्दल बोलणे, त्यांच्या चांगल्या वाईट सवयी किंवा नीतिमत्ते बद्दल बोलणे. अर्थात सांगणे, पण सिनेमा हे दृक्श्राव्य माध्यम  आहे. सांगणे एक वेळ नाटकात काही कारणावश चालू शकते. पण सिनेमात गोष्ट दाखवायची असते तेव्हा व्यक्तिरेखा च्या स्वभाव, सवयी, त्यांची नितीमुल्ये दाखवण्या साठी त्यांना संबंधित संकटात टाकणे हा एकच मार्ग उरतो. उदा. स्लम डॉग मिल्यनयर ह्या चित्रपटात तो लहान मुलगा झोपडपट्टी तल्या शौचालयात बसलेला असतांना कुणीतरी बाहेरून दर अडकवून घेते. आणि अमिताभ बच्चन आल्याचा आवाज चहूकडून घोंघावतो. त्या मुलाला अमिताभ बद्दल किती प्रेम आहे हे खूप कौशल्याने दाखवले आहे. तो अमिताभ चा फोटो वाचवत घाणीत उडी टाकतो आणि तसाच बरबटलेला बाहेर येतो. हे त्याचे अमिताभ प्रेम दोन पानांचा डायालोग सांगू शकला नसता ते अर्ध्या मिनिटात दाखवून दिले आहे. त्या मुलाला लेखकाने निर्दय पणे संकटात टाकले त्या मुळेच त्याचा तो गुण प्रकर्षाने दिसून आला.

४) साहस (Action) -

आपल्या व्यक्तिरेखांना साहस करायला भाग पाडणे. लेखक व्यक्तिरेखेला काहीतरी संकटात टाकतो तेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तिरेखेला काहीतरी साहस करावे लागते. चित्रपट एक दुजे के लिये स्वत:ला पोहता येत नाही तरीही सपनाला वाचवण्यासाठी वासू पाण्यात उडी टाकतो. वासू साहस करतो पण ते फसते आणि सपनाच त्याला वाचवून बाहेर आणते. वासूच्या प्रेमाची गहनता तिला कळते. action फिल्म मध्ये तर ह्या प्रयोगाचा बडीमार करावा लागतो. ह्याची अनेक उदाहरणे सापडतील आणि त्यामुळेच साहसी दृश्य आजकाल रटाळ वाटतात. त्यात नाविन्य आणणे खूप गरजेचे आहे. विशेषत: नायकाला साहसाच्या नावाखाली खूप अति आणि अशक्य कृत्य करायला लावली जातात. ती परिणाम करायला असमर्थ ठरतातच पण बऱ्याचदा हास्यास्पद होतात. तेव्हा साहस action हा भाग कौशल्याने हाताळला पाहिजे.

५) उपकथा ( Sub Plot) -

चित्रपटाची मूळ कथा सांगतांना खूपदा एक जोड्कथा सांगितली तर मूळ कथा जास्त परिणाम कारक होते. नायकाची प्रेमकहाणी सांगतांना आपण त्याच्या मित्राची उपकथा जोडली जो प्रेमात अयशस्वी झाला आणि दारूच्या आहारी गेला. तर नायकाच्या कथेला एक वेगळी किनार मिळते. आपल्या मित्राची हि अवस्था पाहूनही नायक स्वत:ला प्रेमात पडण्या पासून वाचवू शकत नाही हि बाब कथेला निराळी संभाव्यता देते.
कधी कधी मूळ कथेतील एखाद्या पात्राची पूर्वकथा सांगणे आवश्यक असते, त्या साठी त्याची उपकथा जोडावी लागते. लगान ह्या चित्रपटात लगान माफ होईल कि नाही ह्याबरोबरच गौरी आणि भुवन व एलिझाबेथ हा प्रेमाचा त्रिकोण खूप कमी वेळात महत्वाची भूमिका बजावतो.
आपल्या कडे उपकथा खूप जास्त प्रमाणात वापरली जाते त्यामुळे सिनेमा पाल्हाळीक होतो. शोले हा खूप मोठा इतिहास लिहिणारा चित्रपट आहे पण त्यात सुरमा भोपालीची कथा, अंग्रेज के जमाने के जेलर ची कथा, ठाकूर च्या हात कापण्याची कथा, संपूर्ण कुटुंब हत्या दाखवणारी कथा हा सिनेमा खूप लांबवणारा प्रकार होतो.
उपकथा मुला कथेला बळ  देणारी अर्थ देणारी असावी.

६) पराकाष्टा (Culmination)

व्यावहारिक जगात शक्य नसलेल्या गोष्टी पाहण्यासाठीच लोक सिनेमा गृहात येत असतात. त्यामुळे आपल्या व्यक्तिरेखांनी काहीतरी अदभुत अशक्य अश्या गोष्टी करायला हव्यात. पण ह्या प्रयत्नात खूप आगळीक व्हायला नको असते. आपली व्यक्तिरेखा एकदम अवास्तव अविश्वसनिय वाटायला नको. काही गोष्टी अगदी टोकाच्या त्यांनी करायला हव्या असतात पण त्या आपल्या कथेच्या अनुषंगाने जायला हव्यात. उदा- खूप चित्रपटात हिरो दहा पंधरा गुंडांना बदडतो. आपण पाहिलं तर काही चित्रपट ते संयुक्तिक वाटत पण बऱ्याच चित्रपटात ते मनाला पटत नाही. आणि ते प्रेक्षकांच्या मनाला पटल नाही तर सिनेमा फसतो.
लगान मधला भुवन आपली टीम जमवण्यात पराकाष्टा करतो तो फायटिंग करत नाही. कहाणी मधली विद्या बागची आपल्या पतीला शोधण्या साठी नको नको त्या ठिकाणी जाते ह्यातच तिची पराकाष्टा पुर्णत्वाला जाते. पण सिंघम ला तस करून चालणार नाही त्याला फायटिंग करावी लागेल. ही तारेवरची कसरत चित्रपट लिहितांना लेखकाला जमली पाहिजे. एका उत्कर्ष बिंदुला पोहोचल पाहिजे पण प्रेक्षकांच्या सोबत पोहोचल तरच ते फायद्याच आहे.

७) अपयश (failure) -

अपयश सुद्धा चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी वापरता येत. खाकी चित्रपटातली अमिताभ बच्चन ची व्यक्तिरेखा एका अपयशी पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे. तो अपयशी होईल च ह्या एका उद्देशाने त्याला ते काम (एका अतिरेक्याला मुंबईला कोर्टात हजार करणे) सोपवलेल असत. आणि हे जेव्हा स्पष्ट होत तेव्हा कथेला वळण मिळत आणि आता नायकाची यशस्वी होण्याची शक्यता कमी होते त्यामुळे संघर्ष वाढलेला असतो. कहानी मध्ये विद्या बागची वर प्राणघातक हल्ला होतो, पोलिस तिचा फक्त वापर करण्याच ठरवतात ह्या अपयशाने तिला प्रेक्षकांची सहानुभूती मिळते आणि कथा मनाला भिडते.




8) परिवर्तन (Character Change) - 

ह्या संघर्षमय दुसऱ्या भागात नायक पावलो पावली बदलत असतो त्याला येणाऱ्या अनुभवातून त्याच्यात कधी सूक्ष्म तर कधी आमुलाग्र बदल होतात. भ्याड घाबरट नायक अतीव शोषणामुळे बदल घेण्यासाठी खूप आक्रमक आणि साहसी होतो. लगान मध्ये भुवनच्या आत बदल होतो आहे असे जाणवत नाही पण त्याच्यात होणारा बदल सूक्ष्म आहे, पहिला खेळाडू गोलीला पटवताना चा भुवन आणि लाखा टीम मध्ये येवू पाहतो तेव्हाचा भुवन …… तेव्हा भुवन त्याची परीक्षा घेतो. असा बदल माणसाच्या आत होत असतो पण काहीतरी वेगळ्या अनुभव मुळे हे होत आणि असे अनुभव अनुभवण्या साठीच तर प्रेक्षक सिनेमा हॉल मध्ये यात असतात. हा अनुभव जितका मोठा तितका व्यक्तिरेखेत होणारा बदल मोठा आणि प्रेक्षकांना भावणारा असतो. सदसद विवेक बुद्धी असलेला प्रोफेसर गुन्हेगार होतो. इमानदार पोलिस खुनी बनतो. अर्थात कोणत्याही प्रकारात येणारा तोच तोच पणा परिणामकारकता कमी करतो. कलेच्या विश्वात सतत नाविन्य आले पाहिजे. आपल्या नायकाचे किंबहुना महत्वाच्या व्यक्तिरेखा मध्ये परिवर्तन झाले पाहिजे. नुसती वाढ नको. त्याचे ज्ञान आणि अनुभव समृद्ध झाले पाहिजेत त्यासोबत प्रेक्षकांचेही तसेच घडले पाहिजे. प्रेक्षक जो सिनेमा थिएटर मध्ये गेला तोच तसाच बाहेर आला तर आपण गोष्ट सांगण्यात कमी पडलो, स्टोरी टेलर म्हणून अपूर्ण राहिलो असेच म्हणावे लागेल. उत्कृष्ट सिनेमा पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांचे चेहरे पाहण्याचा अभ्यास करावा. वरील वक्तव्याचा अनुभव तुम्हालाही येईल.



९) दुसरा  झटका (Plot Point Two )
पहिल्या भागात ज्या प्रमाणे शेवटी एक उत्कर्ष बिंदू आपण आणतो त्या प्रमाणेच दुसऱ्या भागाच्या शेवटी देखील संघर्षाचा उच्च बिंदू असायला हवा. जसा क्रिकेटची मैंच संपताना दोन ओव्हर आणि १५ रन अशी अटीतटीची सिच्युएशन येते तश्याच प्रकारे  हा दुसरा झटका यायला हवा. लगान …………… एकटा  भुवन बोलर च्या सहाय्याने एवढे रन काढू शकणार नाही . हे जवळ जवळ निश्चित स्पष्ट दिसते आहे. आता हार नक्की, आता तीन वर्षाची लगान कशी भरणार ? सगळा अंधार ------ उत्तर नाहीच ! हा दुसरा झटका कथेला तिसऱ्या भागात प्रवेश करवतो. नायकाला आपण जे करतो आहोत ते सारे व्यर्थ जाते आहे असे वाटणे सोबत प्रेक्षकांनाही त्याच भावनेने झपाटणे ह्यामुळे तिसऱ्या भागात म्हणजे आता पुढे काय होईल ? प्रेक्षक शेवटचा निर्णय जीव मुठीत घेवून पाहायला तयार होतात. तो असतो climax. ह्या climax चा इंटरेस्ट ह्या Plot Point Two मध्ये लपलेला असतो.



भाग तीन - समारोप  (ACT Three Resolution)

प्रेक्षकांचा प्रवास नायकच्या सोबत चालत आलेला आहे. नायकाला जे काही हवे आहे त्या साठी त्याचा संघर्ष आता टोकाला पोहोचलेला आहे. कथेच्या शेवटी त्याचे ध्येय त्याला मिळणार आहे आणि आता कथा शेवटला आलेली असतांना जर असे वाटत असेल कि ते त्याला सहज मिळेल तर त्या मिळण्यात मौज असणार नाही. मौज तेव्हाच येईल ज्यावेळी प्रेक्षकांच्या मनात धाकधूक असेल ……। हिरोला हवे ते त्याला मिळेल कि नाही ? अनिश्चितता uncertainty ह्यातच जीवनाची मजा आहे. आपल्या खरोखरच्या जीवनातही जर काय मिळणार आहे आणि काय नाही हे निश्चित पणे  माहित झाले तर प्रयत्नांना काहीही अर्थ उरणार नाही. प्रयत्न केवळ आशेपोटी केले जावू शकतात पण अनिश्चितते मुळेच त्यांना अर्थ प्राप्त होतो. सिनेमा आपल्या जीवनाच भव्य रूप आहे त्यात जीवनातली रिक्तता पूर्ण झालेली बघायला आवडते पण काही मुल्य जी त्रिकाळ बाधित आहेत ती सदैव तशीच राहतात.
त्यासाठी नायक दुसऱ्या भागाच्या शेवटी एका मोठ्या अपयशाला सामोरा जातो. आणि त्याला हवे आहे ते किती दुसाध्य आहे ! मिळवायला  किती कठिण आहे ! याची प्रचीती येते. पण आशा सुटलेली नसते. त्याच्या म्हणजे नायकाच्या  संघर्षाची परिसीमा झालेली असते. त्याने आयुष्याचा खूप मोठा अनुभव घेतलेला असतो. त्या अनुभवाने त्याच्या आतून काही बदल घडवलेले असतात. कदाचित त्याचे ध्येय त्याला मिळणार नाही पण तरीही तो खूप काही मिळवून असतो, अनुभवाचं संचित जे मिळणार आहे किंवा नायक मिळवणार आहे त्या पेक्षा जास्त मोलाच असत.
कथेतल्या आता पर्यंतच्या प्रवासात काही नाती पणाला लागलेली असतात. काही मित्र ? कदाचित प्रेयसी ? कदाचित आई वडील काका मामा ह्या लोकांची पारख झालेली असते. काहीनी सोबत निभावलेली असते …… तर काही सोडून गेलेले असतात. काही नात्यासाठी नायकाने केलेले बलिदान वाया गेलेले असते, काही महत्व न दिलेले नाते संबध जवळ आलेले असतात. खूप काही कथेतून मिळालेले आणि खूप काही दुरावलेले असते. अगदी एका संपूर्ण आयुष्या सारखा अनुभव किंवा एका संपूर्ण आयुष्या एवढा अनुभव नायकाला मिळालेला असतो. आता ज्या ध्येयासाठी प्राण पणाला लावले ते ह्या क्षणी व्यर्थ वाटू लागते. पण तरीही आशा पूर्णत: विझलेली नसते. आणि जे दुष्प्राप्य वाटते ते तो पुन्हा प्राण पणाने लढून मिळवणार आहे. कसे ते ह्या तिसऱ्या भागात होणाऱ्या मोठ्या संघर्षा तून बघायला मिळणार आहे.
तिसऱ्या भागाची सुरवात बहुदा ह्या खालच्या बिंदू पासून होते, मी बहुदा असे म्हणतो आहे. कारण हा पक्का अढळ असा नियम नाही. तुमची कथा कदाचित तुम्हाला तस करू देणार नाही तर तुम्ही बळजबरी करू नये. पण सरसकट पाने बहुदा असे होते किंवा असावे.
मग जो शेवटचा संघर्ष सुरु होतो तो climax कडे जातो. climax शेवटचा अतिटतीचा सामना असतो. क्रिकेट मध्ये दोन ओव्हर बाकी असताना हाती विकेट नाही आणि १५ रन करायचे आहेत होवू शकतात पण नाही होवू शकत याचीही तितकीच शक्यता असते. किंवा पन्नास टक्क्या पेक्षा जास्त शक्यता हरण्याची असते. आणि लढाई होते. आता हर म्हणजे हार च आहे आता दुसरा डाव टाकता येणार नाही.
आता प्रेयसी नायकाला नाही मिळाली तर पुन्हा मिळूच शकणार नाही. तिच्या लग्नात climax येतो आणि ऐनवेळी तो नायका सोबत पळून जाते. किंवा तिच्या बापाच हृदय परिवर्तन होत आणि तोच तिला पळून जायला सांगतो.
आता नायकाच्या हातून खलनायक वाचला तर पुन्हा बदल घेण्याचा चान्स मिळणार नाही पण अचानक कुणीतरी नायकाच्या हाती पिस्तुल देत आणि नायक खलनायकाला गोळ्या घालतो. खऱ्या अर्थाने समारोप होतो. नायक सोबत प्रेक्षक ही सुटतात. आणि तो अभागी क्षण येतो जो आम्हा प्रेक्षकांना पुन्हा त्याच रटाळ वास्तव जीवनात आणून सोडतो. दिवे लागतात एका जिवंत स्वप्नातून जाग येते. A sad moment when you return to your ordinary life after watching an awesome Movie.


भाग तीन लगान (Act Three with LAGAAN)


३२३ पैकी चार विकेट वर ९९ रन करून दुसरा दिवस संपतो. साऱ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भयाण उदासी

आपले सर्व बल्लेबाज आउट झालेले आहेत उरलेले रन करणे अशक्य आहे. रडारड सुरु होते आणि ओ पालनहारे चे स्वर येतात. इथून सुरु होतो तिसरा भाग Act Three सुरु होतो. म्हणजे अक्ट थ्री ची ही काही सीमारेषा नाहीये. पण ह्या अंधुक अस्पष्ट रेषेपासून कथा आपल्या सर्वोच्च बिंदू कडे जावू लागते. सगळे बटमन आउट झाले हा पराजय जवळ जवळ पराजया एवढाच आहे. आणि हि जी लढाई चाललेली आहे ती तितकी सोपी नाही. जिंकणे किती कठीण जवळपास अशक्य आहे. आणि निर्णायक क्षण जवळ येवून ठेपला आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होतो, इसर काका आणि भुवन - भुवन आपले ५० रन पूर्ण करतो आणि त्या आवेशात इसर काकाची क्षमता विसरतो. इसर काका दमतो धावू शकत नाही आणि रन आउट होतो. गुरण आणि गोळी ही पटापट जातात. ह्या निराशेत इस्माईल पुन्हा एक आशा घेवून येतो. त्याला रनर दिला जातो. गावातला लहान मुलगा, बाजी जमते. खेळ रंगत येतो. काही रन जमा होतात. आणि आवेशात धावण्याच्या तयारीत पुढे गेलेला मुलगा ………. बॉलर थबकतो. सारे आश्चर्याने पाहतात, तो स्टंप उडवतो. मुलगा रन आउट होतो. खूप मोठा आधार देवून पुन्हा खूप मोठा प्रश्न निर्माण करत इस्माईल परत जातो.

भुरा येतो पण त्याच्याकडून काय आशा करणार ? कशी बशी थोडी साथ निभावतो आणि रन आउट होत असलेल्या भुवनला वाचवण्या साठी स्वत: आउट होतो. त्याच आऊट होण त्याच्या व्यक्तिरेखेला उंची देवून जात. मग येतो कचरा …………. अपंग ! हा बल्लेबाजी कशी करणार ? साथ कशी देणार ? हा बटिंग एन्ड ला आला तर आउट होणार आणि खेळ खलास ! climax ची अटीतटी ची परिस्थिती situation कशी निर्माण केलेली आहे. कुठल्याही क्षणी सगळ काही संपू शकेल ! पण छोट्या छोट्या घटनांनी बारीक सारीक आधारावर खेळ पुढे पुढे सरकत राहतो. आणि प्रेक्षकांच्या आशा पालवत ठेवतो.
कचरा येतो बटिंग ला भुवन त्याला सुचवतो फक्त एक रन काढ.
कचरा रन न घेता तीन बॉल वाया घालवतो, टेन्शन वाढत जाते.
आणि कचरा एक रन घेतो भुवनला bating  मिळते. पण तरीही पुन्हा एकाच घ्यावा लागणार कारण ओव्हर बदलणार असते. आणि तो मिळतो. आता सहा बॉल  दहा रन !
भुवनला इंज्युअर करण्याचा प्रयन्त आणि त्यात भुवनला चार रान मिळतात.
आणि भुवन इंज्युअर होतो ------- एक रन आणि कचरा बटिंग  एन्डला ! तीन बॉल पाच रन !
कचरा एक रन घे ! पण बॉल वाया जातो. फक्त दोन बॉल ………………….
पुन्हा कचरा मारू शकत नाही …… बॉल वाया ……. फक्त एक बॉल ……. पाच रन !
कचरा सिक्स मारेल ? शक्यता नाही ……… सर्वोच बिंदू ! प्रेक्षकांच्या पाठीचा कणा ताठ होतो. पापण्या झपकायच विसरतात. बॉल येतो कचरा मारतो -------- फक्त एक रन !
घोर निराशा ------- भुवन bat पकडून बसतो. सारे इंग्रज खुश होतात. तोच अस्पष्ट आवाज येतो. नो बॉल ! तो कुणी ऐकल्यासारखा नाही म्हणून पुन्हा “ नो बॉल “ आणि आशा पालवतात. भुवनला सिक्स मारण्याचा चान्स आहे. आणि तो मारणार नक्की !
बॉल येतो आहे. भुवनच्या साऱ्या शक्ती ऐकवटतात. सगळे चेहरे आठवातून सरकतात. तो जीव घेवून फटका मारतो. बॉल उंच जातो. रसेल कॅच घेण्यासाठी मागे मागे सरकतो आहे.  कॅप्टन रसेल भुवनचा कॅच घेण्यासाठी झेपावतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनाची अवस्था काय होते ? हा कॅच सुटावा पण तो घेतो --------- आणि कॅच घेतो. प्रेक्षक गर्तेत पडतो.  रसेल कॅच घेतलेला मिड शॉट मध्ये अर्धाच दिसतो. भुवन आउट झाला. पण हम्पायार चे हात सिक्स दाखवन्या साठी उंचावतात आणि दिसते कि रसेल बॉऊड्री च्या बाहेर उभा असतो.
आणि कळते कि कॅप्टन रसेल बॉंड्री च्या बाहेर उभा आहे. हा सीन लिहिण्यात आणि टेकिंग कॅमेरा वर्क सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहे.
विजयाचा जल्लोष ……. समारोपाच भाष्य ! कॅप्टन रसेल च पुढे काय झाल ? एलिझाबेथ च काय झाल ? आणि भुवन च काय झाल ?
प्रेक्षक एका दिव्य विश्वातून बाहेर पडतो.


कथे संबधी काही महत्वाचे

आपली कथा परिणाम कारक होण्यासाठी काही बाबी कडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपली कथा खूप पाल्हाळीक होवू नये. तिच्या मूळ सूत्राला धरून ती जायला हवी. तिचा आपला स्वभाव असावा, आपली धाटणी, एक विशिष्ट व्यक्तित्व तिचे सांभाळले जावे यासाठी काही नियम लक्षात ठेवण्या सारखे आहेत.

अनावश्यक भाग गाळा

      कधी कधी आपणास नाट्यपूर्ण वाटणारा प्रसंग कथेच्या दृष्टीने नगण्य असतो, काहीही महत्वाचा नसतो. वेगळाच कारणाने तो आपल्याला भावलेला असतो. जसे कुठल्या तरी हिट सिनेमा सारखा प्रसंग. कुठल्यातरी सुपरस्टार सारखा वाटणारा लूक. मान्यवर अक्टर ची आवड सांभाळण्या साठी , प्रोड्युसर ची पसंदी इ. काहीही कारण असते आणि आपणास तो भाग आवडतो पण तो कथेसाठी अजिबात महत्वाचा नसतो. अश्यावेळी आपण आपल्या कथेशी प्रामाणिक राहायला हवे असते. कारण  आपला माय बाप प्रेक्षक आपली कथा अनुभवण्या साठी येणार असतो. प्रेक्षक कधीही कुण्या हिरो साठी किंवा एखाद्या सुपरहिट चित्रपटा च्या डूप्लीकेट सीन साठी सिनेमा हॉल मध्ये येत नाही. काही लोक येतात एखाद्या सुपर स्टार साठी पण ते त्या सुपरस्टार साठी येत नसून त्या स्टार  चे चित्रपट बहुदा चांगले असतात म्हणून येतात. आणि हा चागला नसला तर ते नाकारतात. कथे ला पुढे नेणारे सीन फक्त कथेत असावेत हा पक्का नियम सदैव पाळावा. कथा परिणाम कारक झाली तरच सुपरस्टार आपली किंमत टिकवू शकणार आहे हे ध्यानात ठेवावे. कहाणीला पोषक नसणारा भाग निर्दय पणे वगळून टाकावा.

खूप स्पष्टीकरण टाळावे

आपल्या कथेत मधल्या व्यक्तिरेखा characters कधी कोणत्या ठिकाणी होत्या ? तो इतक्या वेळात ह्या ठिकाणी कसा पोहोचला ? समजा तो पोलिस अधिकारी आहे तर तो असे कसे करेल ? ह्या अश्या गोष्टींची कारण मीमांसा द्यायला हवी असते. पण हि कारण मीमांसा देण्या साठी खूप वेळ खर्ची घालू नये. आणि तितक्याश्या महत्व नसलेल्या गोष्टींची खूप स्पष्टीकरण देत बसू नये. त्यामुळे कथेमध्ये माहितीपटा चे स्वरूप येवून ती रटाळ वाटू शकते. त्यातली भावनिकता कमी होवू शकते. आजकाल प्रेक्षक बरेच हुशार झाले आहेत. बऱ्याच बारीक सारीक गोष्टी फक्त सुचावातच ते समजतात. उदा. चित्रपटात एखाद्या स्त्री ला ओकारी आली तर लगेच ती प्रेग्नंट असल्याचे त्यांना कळते, घड्याळ दाखवताच त्यांना कळते कि उशीर होतो आहे. जास्त स्पष्टी कारण देण्या मध्ये सिनेमाचा स्पीड कमी होवू शकतो. जाहिराती मध्ये ज्या प्रमाणे वेळ वाचवतात आणि फक्त आपल्या महत्वाच्या ध्येयावर प्रेक्षकांचे लक्ष टिकवून ठेवतात तसेच काहीसे चित्रपटात करायला हवे असते. कारण आजकाल पब्लिक कडे वेळ कमी असतो.


अनपेक्षित unexpected



आपल्या चित्रपटाचा अनुभव अनोखा अप्रतिम झाला तरच आपण यशस्वी होणार आहोत. आपल्या कथेतून हा अनुभव कसा व्यक्त होईल याचा ध्यास आपणास लागला पाहिजे. काही अनपेक्षित वळण कथेत आली पाहिजेत. हि अनपेक्षितता खूप जास्त नको व्हायला आणि खूप अपेक्षित पण नको राहायला. अपेक्षित अस काही दाखवता दाखवता अचानक कुतूहल जागृत करेल, आश्चर्याचा धक्का देवून सुखावेल अशी रचना जमली पाहिजे. धक्क्या वर धक्के देणे म्हणजे सुखावणे नव्हे. उगाच प्रेक्षकांना कोड्यात टाकणे न पटणारे वळण कथेला देणे टाळावे. अर्थात आजकाल चालणारे रिमेक पहिले तर हे म्हणणे हास्यास्पद वाटेल. रिमेक पेक्षा आजकाल केवळ असेम्ब्ली केली जाते त्यात काही सीन हिरोला हवे असलेले काही हिरोइन साठी काही गाणी ठरलेली उदा. आयटम सॉंग. अश्या प्रकारची फायटिंग, अश्या प्रकारची अक्शन इ. अनेक गोष्टी. पण हे सिनेमा साठी फार काळ चालणार नाही. हा गल्लाभरू शोर्ट कट असू शकतो पण चिर स्मृती ठेवणारा Milestone ठरू शकणारा चित्रपट जर करायचा असेल तर खूप कौशल्य वापरून काम केले पाहिजे.
पुढील भागातून आपण सीन कसा करायचा ? का करायचा ? आणि तो कसा असावा ह्या विषयी माहिती पाहू. प्रिय वाचकांनी काही प्रश्न विचारावेत अशी अपेक्षा आहे. ह्या लेखन व्यापाचा खरोखर कोण कोण किती फायदा घेत आहे याचा अंदाज यावा. प्रश्न पडल्या शिवाय कोणतीही गोष्ट सखोल समजत नाही. असे माझे मानणे आहे. कृपया .